advertisement

Crime News: पैशांच्या वादाने टोक गाठलं, मित्राला कोयत्याने तोडलं; अंबाजोगाईतील हाॅटेलात घडला थरार!

Last Updated:

Crime News: अंबाजोगाईतील हाॅटेलमध्ये दारू पित बसलेल्या तिघा मित्रांमधील दोघांच्यात पैशांवरून भांडण सुरू झाले. वाद टोकाला गेला आणि एकाने दुसऱ्या मित्रावर...

Crime News
Crime News
Chhatrapati Sambhajinagar : हाॅटेलमध्ये दारू पित बसलेल्या तिघा मित्रांमधील दोघांच्यात पैशांवरून भांडण सुरू झाले. वाद टोकाला गेला आणि एकाने दुसऱ्या मित्रावर कोयत्याने सपासप वार करून जागीच संपवले. ही घटना  अंबाजोगाईतील एका हाॅटेलात घडली. अविनाश शंकर देवकर (वय-35) असे या मृत तरुणाचे नाव आहे. यासंदर्भात अविनाशच्या आईने पोलिसांत फिर्याद दिली. या प्रकरणातील आरोपी स्वराज कारभार पौळ याला अवघ्या 6 तासांत पोलिसांनी अटक केली.
पैशांच्या वाद सुरू झाला आणि मित्रावर कोयत्याने वार केला
समोर आलेली माहिती अशी की, अंबाजोगाईतील एका हाॅटेलमध्ये अविनाश, स्वराज आणि सलमान मुस्तफा शेख हे तिघेजण दारू पित बसले होते. त्याचवेळी अविनाश आणि स्वराद यांच्यामध्ये पैशांवरून जोरदार भांडण सुरू झाले. वाद टोकाला गेल्यानंतर अविनाश बाजूच्या केबिनमध्ये गेला, त्याचवेळी स्वराजने त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. हा हल्ला इतका भयानक होता की, अविनाशचा जागीच मृत्यू झाला. मृत अविनाशवरही चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
advertisement
पुण्याला पळून निघालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या
यावेळी सलमानने दोघांची भांडणं सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यात तोही जखमी झाला. या घटनेनंतर सलमानने पोलिसांना त्वरित माहिती दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि सीडीआरच्या मदतीने आरोपी स्वराज माग काढला. तर तो लातूरमधून पुण्याला पळून जाण्याच्या तयारीत होता. पण त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला अटक केली. अविनाशची आई अंजना शंकर देवकर यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Crime News: पैशांच्या वादाने टोक गाठलं, मित्राला कोयत्याने तोडलं; अंबाजोगाईतील हाॅटेलात घडला थरार!
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement