advertisement

चंद्रावर काय घडलं होतं? Isroच्या महत्वाकांक्षी Missionमधून उलघडणार सर्वात मोठे कोडे! करणार 1200 कोटींचा खर्च

Last Updated:

Chandrayaan 4: चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचणारा भारत आता चंद्राच्या पृष्ठभागावरून मातीचे नमुने गोळा करून परत आणणार आहे. इस्रोकडून चंद्रयान फोर तयारी सुरू असून ही मोहीम 2027-28 पर्यंत पूर्ण करण्याची योजना आहे.

News18
News18
नवी दिल्ली: भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था (इस्रो) आता चंद्रावरून मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्याच्या तयारीत आहे. ‘चंद्रयान फोर’ नावाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी इस्रोने तयारी सुरू केली आहे. या मोहिमेचा अंतिम उद्देश 2040 पर्यंत एका भारतीय अंतराळवीराला स्वदेशी अंतराळयानाद्वारे चंद्रावर उतरवण्याचा आहे. चंद्रयान-2 व 3 चे ऑपरेशन डायरेक्टर आणि इस्रोचे वरिष्ठ शास्त्रज्ञ अमिताभ कुमार यांनी याबाबत संपूर्ण योजना उलगडून सांगितली.
चंद्रयान फोर : सॅम्पल रिटर्निंग मिशन
चंद्रयान फोर मोहिमेला ‘सॅम्पल रिटर्निंग मिशन’ असे नाव देण्यात आले आहे. या मोहिमेत एक अंतराळयान चंद्रावर जाऊन मातीचे नमुने गोळा करेल आणि ते पृथ्वीवर घेऊन येईल. या आधी इस्रोने चंद्रावर यशस्वी लँडिंग केलं आहे. मात्र आता चंद्रावरून माघारी येणं आणि माती आणणं हे पुढचं पाऊल असेल.
advertisement
डॉकिंग-अनडॉकिंगचा यशस्वी प्रयोग
या मोहिमेचा महत्त्वाचा भाग म्हणजे डॉकिंग व अनडॉकिंग प्रक्रिया. यामध्ये एक अंतराळयान दुसऱ्या यानाला जोडते आणि नंतर वेगळी होते. ही प्रक्रिया इस्रोने पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीरित्या पार पाडली आहे. पुढील टप्प्यात याच प्रक्रियेची चंद्राच्या कक्षेत चाचणी होईल. यानंतर अंतराळवीर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून मातीचे नमुने गोळा करून परत येईल.
1200 कोटींचा खर्च
चंद्रयान फोरसाठी अंदाजे 1200 कोटींचा बजेट निश्चित करण्यात आला आहे. हा प्रकल्प 2027-28 पर्यंत पूर्ण करण्याची योजना आहे. यासाठी तांत्रिक आणि वैज्ञानिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे.
advertisement
मौल्यवान माहिती
अमिताभ कुमार यांच्या मते, चंद्रयान केवळ भारताचा अभिमान नसून, हा विज्ञानासाठी एक मौल्यवान स्रोत आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर अवघ्या 10-15 सेमी आत तापमानात मोठी घट होते. हे लक्षात येते की चंद्राच्या आतील भागात बर्फ किंवा तापमान कमी करणारे पदार्थ असू शकतात. त्याचप्रमाणे चंद्राच्या दक्षिणी ध्रुवाजवळ पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला. या भागातील माहिती इतर देशांकडील माहितीस पूर्णपणे भिन्न आहे. आणि त्यातून नवे वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होत आहेत.
advertisement
चंद्रावर पूर्वी जीवन होतं का?
शास्त्रज्ञच्या मते, कधीतरी चंद्रावरही जीवन असण्याची शक्यता होती. तिथे काय घडलं, जेणेकरून जीवन नष्ट झालं? आणि अशीच कोणती घटना पृथ्वीवर घडू शकते का? जी भविष्यात मानवाच्या अस्तित्वावर संकट निर्माण करेल? हे समजून घेण्यासाठी चंद्राच्या अभ्यासाची नितांत गरज आहे.
गंभीर परिणाम?
संशोधनानुसार, चंद्र हळूहळू पृथ्वीपासून दूर जात आहे. याचा अर्थ पृथ्वीचा गुरुत्वाकर्षण कमी होत आहे किंवा चंद्राचे वाढत आहे. हे बदल पृथ्वीवरील भरती-ओहोटीवर परिणाम करू शकतात. ज्या पद्धतीने समुद्रात भरती-ओहोटी होते. त्यात बदल झाल्यास पर्जन्यचक्रात अडथळा, पर्जन्याचा अभाव, दुष्काळ आणि अन्नटंचाई येऊ शकते.
advertisement
मिशन चंद्रयान
या सर्व वैज्ञानिक बाबी लक्षात घेता. मिशन चंद्रयानसारखे प्रकल्प केवळ राष्ट्राच्या अभिमानासाठी नाहीत. तर मानवतेच्या भविष्याच्या दृष्टीनेही अत्यंत आवश्यक आहेत. चंद्रावरून माती आणणं, तिथे मानव पाठवणं आणि त्या आधारावर पृथ्वीवरील संभाव्य संकटांपासून मानवजातीला वाचवणं — हीच या मोहिमेमागची खरी प्रेरणा आहे.
view comments
मराठी बातम्या/Explainer/
चंद्रावर काय घडलं होतं? Isroच्या महत्वाकांक्षी Missionमधून उलघडणार सर्वात मोठे कोडे! करणार 1200 कोटींचा खर्च
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement