Coconut Water: महिनाभर रोज रिकाम्या पोटी नारळ पाणी प्यायलं तर काय होईल? आश्चर्यकारक माहिती समोर

Last Updated:

नारळ पाणी पिणं हे तुमच्या तब्येतीसाठी खूप फायदेशीर आहे. दिवसभरात कधीही तुम्ही नारळ पाणी पिऊ शकता. रोज सकाळी रिकाम्या पोटी नारळ पाणी प्यायल्यानं शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.

मुंबई : नारळ पाणी पिणं हे तुमच्या तब्येतीसाठी खूप फायदेशीर आहे. दिवसभरात कधीही तुम्ही नारळ पाणी पिऊ शकता. रोज सकाळी रिकाम्या पोटी नारळ पाणी प्यायल्यानं शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. नारळाच्या पाण्यात नैसर्गिकरित्या जीवनसत्त्वं, खनिजं आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे शरीरासाठी फायदेशीर असतात. हे पाणी 1 महिना रोज पिण्याचे फायदे जाणून घेऊया.
1. हायड्रेशन -
पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियमसारखे इलेक्ट्रोलाइट्स नारळाच्या पाण्यात आढळतात, जे शरीराला चांगल्या पद्धतीनं हायड्रेट ठेवतात. नारळाचं पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यानं शरीराला झटपट हायड्रेशन मिळते, विशेषतः रात्रीच्या झोपेनंतर जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते, तेव्हाही हायड्रेशन कायम राखण्याचं काम नारळाच्या पाण्यामुळे शक्य होतं.
2. वजन कमी होणं -
नारळाच्या पाण्यात कॅलरी कमी असतात आणि नैसर्गिकरित्या ते फॅट फ्री असतं. सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यायल्यानं शरीरातील चयापचय गती वाढते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
advertisement
3. उत्तम पचन -
नारळाचं पाणी पोटासाठी हलकं असतं आणि त्यात फायबर असते, जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतं. रोज नियमितपणे नारळ पाणी प्यायल्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो आणि पचनशक्तीही सुधारते.
4. डिटॉक्सिफिकेशन -
नारळ पाणी नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून देखील कार्य करतं, शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास नारळ पाण्याची मदत होते. नारळ पाण्यामुळे, यकृत आणि मूत्रपिंडाची कार्यक्षमता वाढवते. यामुळे शरीरात ऊर्जा कायम राहते.
advertisement
5. चमकणारी त्वचा -
नारळाच्या पाण्यात अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असतं, यामुळे त्वचेला आतून चमकण्यात आणि निरोगी ठेवण्यात याची मदत होते. जर तुम्ही 1 महिना नारळाच्या पाण्याचं सेवन केलं तर ते त्वचेमध्ये ओलावा निर्माण करतं आणि मुरुमांपासून बचाव करण्यास देखील मदत करते.
6. रक्तदाब नियंत्रणासाठी उपयुक्त -
नारळाच्या पाण्यात पोटॅशियम मोठ्या प्रमाणात आढळतं, ज्याचा उपयोग रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी होतो. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी सकाळी रिकाम्या पोटी नारळपाणी पिणं फायदेशीर ठरू शकतं.
advertisement
7. चयापचय आणि ऊर्जा -
नारळपाणी पिण्यानं शरीराला ऊर्जा मिळते आणि थकवाही दूर करते. यात चयापचय वाढवण्याची क्षमता आहे, ज्यामुळे शरीरातील ऊर्जा पातळी देखील सुधारते.
नारळाच्या पाण्यात अनेक प्रकारची जीवनसत्त्वं आणि खनिजं आढळतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. त्यात अँटिऑक्सिडेंट असतात, जे शरीराला बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करतात आणि तुमची प्रतिकारशक्ती वाढवतात. नारळाचं पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं हे खरं असलं तरी ते मर्यादित प्रमाणातच घेतलं पाहिजे. दिवसातून एक किंवा दोन ग्लास नारळ पाणी पिणे पुरेसं आहे. जास्त प्रमाणात सेवन केल्यानं काही लोकांमध्ये इलेक्ट्रोलाइट असंतुलन होऊ शकते, विशेषत: त्यांना मूत्रपिंड किंवा हृदयाच्या समस्या असेल तर अशा व्यक्तींना अतिसेवनाचा त्रास होऊ शकतो.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Coconut Water: महिनाभर रोज रिकाम्या पोटी नारळ पाणी प्यायलं तर काय होईल? आश्चर्यकारक माहिती समोर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement