advertisement

मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयाचा अपघातात मृत्यू, कारवर 'आण्णा' लिहिल्याने संशय वाढला

Last Updated:

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक असलेल्या अतुल घरत यांचा पाटोदा तालुक्यात रात्री झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.

News18
News18
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड: बीड जिल्ह्याला हादरवून टाकणारी एक मोठी घटना समोर आली आहे. पाटोदा तालुक्यातील दासखेड फाटा येथे रात्रीच्या वेळी भरधाव वेगात आलेल्या एका चारचाकी गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक असलेल्या अतुल घरत (रा. महाजनवाडी, ता. बीड) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
अपघातानंतर चारचाकीचा चालक घटनास्थळावरून तत्काळ फरार झाला आहे. विशेष म्हणजे, ज्या गाडीने अतुल घरत यांच्या दुचाकीला धडक दिली, त्या गाडीवर 'आण्णा' असा मजकूर लिहिलेला असून, गाडीच्या आतमध्ये पोलिसांची वर्दी आढळल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे या अपघातामागे घातपात असल्याचा संशय सोशल मीडियातून व्यक्त केला जात आहे, ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement

अपघात की घातपात?

बीड तालुक्यातील महाजनवाडी येथील रहिवासी असलेले अतुल घरत हे पाटोदा येथून आपल्या गावी परत येत असताना दासखेड फाटा येथे त्यांच्या दुचाकीला भरधाव चारचाकीने जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, अतुल घरत यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघात घडवून चालक फरार झाल्यानंतर स्थानिक लोकांनी अपघातस्थळी धाव घेतली. यावेळी तपासणी केली असता अपघातग्रस्त चारचाकीवर 'आण्णा' असं लिहिलेलं आढळलं आहे. अतुल घरत हे मनोज जरांगे यांचे निष्ठावान समर्थक असल्याने, हा अपघात नसून जाणूनबुजून केलेला घातपात असावा, असा संशय आता व्यक्त होत आहे. या संशयाची सुई वाल्मीक आण्णा कराड यांच्या दिशेनं जात आहे. कारण मागच्या काही काळात मनोज जरांगे यांनी संतोष देशमुख खून प्रकरणावरून वाल्मीक कराडला चांगलंच घेरलं होतं. याच कारणातून हा घातपात घडवलेला असू शकतो, अशी चर्चा सध्या सुरू आहे. मात्र या अपघाताशी वाल्मीक कराड याचं थेट कनेक्शन असल्याचा कोणताही पुरावा समोर आला नाही.
advertisement
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून, अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या प्रकरणातील सत्य काय आहे? हा अपघात होता की घातपात, हे फरार चालकाला अटक केल्यानंतरच स्पष्ट होऊ शकेल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयाचा अपघातात मृत्यू, कारवर 'आण्णा' लिहिल्याने संशय वाढला
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement