Narayan Rane : मनोज जरांगेंचं इलेक्शन ‘प्लॅनिंग’, नारायण राणेंनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले…
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
मराठा समाजाच्या अपक्ष उमेदवारीनं कुठलाच फरक पडणार नसल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
धाराशिव, बालाजी निरफळ, प्रतिनिधी : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी अंतरवाली सराटीमध्ये राज्यभरातील मराठा बांधवांची बैठक बोलावली होती. मराठा समाजानं प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून एकच अपक्ष उमेदवार उभा करावा असं आवाहन त्यांनी या बैठकीत बोलताना केलं. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांच्या या आवाहनावर भाजप नेते नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नारायण राणे यांनी आज सहकुटुंब तुळजाभवानीचं दर्शन घेतलं, त्यानंतर ते प्रसारमाध्यमांंशी बोलत होते.
नेमकं काय म्हणाले राणे?
मराठा समाजाच्या उमेदवारीनं कुठलाच फरक पडणार नाही, सगळ्यात जास्त मराठा समाज हा भारतीय जनता पार्टीसोबत आहे. स्वतः मी 96 कुळी मराठा भारतीय जनता पार्टीसोबत आहे. मराठा समाजाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे एक तर ते उमेदवार उभे करणार नाहीत किंवा केल तरी फरक पडणार नाही, असं म्हणत नारायण राणे यांनी अप्रत्यक्षपणे मनोज जरांगे पाटील यांना टोला लगावला आहे.
advertisement
पुढे बोलताना ते म्हणाले की, मला राज्यासह देशाची सेवा करण्याची संधी मिळावी असं साकडं मी आई तुळजाभवानीला घातलं आहे. पुन्हा एकदा मला मंत्रिपद मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मोदी यांच्या नेतृत्वात 400 पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत. त्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
Location :
First Published :
March 25, 2024 1:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Narayan Rane : मनोज जरांगेंचं इलेक्शन ‘प्लॅनिंग’, नारायण राणेंनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले…