Maharashtra politics : '...म्हणून तेव्हा तुम्ही मातोश्रीवर आलात'; ठाकरेंचा अमित शहांना टोला

Last Updated:

धाराशिवच्या सभेमधून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

News18
News18
धाराशिव, प्रतिनिधी : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 2019 ला निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी मातोश्रीवर का आले होते? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारासाठी का बोलावलं? कारण त्यांना फक्त शिवसेनेची मत पाहिजे होती. आम्ही कायमच भाजपला खांद्यावर घेतलं, जर खांद्यावर घेतलं नसतं तर चार खांदे मिळाले असते, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला आहे, ते धाराशिवमध्ये बोलते होते.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
'भाजपनं आपल्या पाठीत वार केलाच, अमित शाह यांनी मला बंद खोलीत शब्द देऊन दगा केला. तुळजा भवानाची शपथ घेतो शाहांनी शब्द दिला होता, मात्र त्यांनी दगा केला. मीही बाळासाहेबांना वचन दिलं होतं.' असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, समाजातील प्रश्नांबद्दल भाजपचे मंत्री मोदींसमोर कधीच बोलत नाहीत, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवचं नामांतर कोणी केलं हे  केंद्रीय गृहमंत्र्यांना माहिती नाही. दहा वर्ष सत्तेत होते, मग तेव्हाच नामांतर का केलं नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.
advertisement
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मणिपूर प्रकरणावरून देखील भाजपवर निशाणा साधला आहे. महिला दिनाच्या शुभेच्छा कोणत्या तोंडानं द्यायच्या, मणिपूरमधील महिलांवर कोणी बोलत नाही, महिलांनी आता कालीमातेचं रूप घ्यायला पाहिजे.  आमच्या संघर्षाला महिला शक्तीचा आशीर्वाद पाहिजे. आपलं सरकार येणार, आम्ही दिल्लीत आपलं सरकार आणणार असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Maharashtra politics : '...म्हणून तेव्हा तुम्ही मातोश्रीवर आलात'; ठाकरेंचा अमित शहांना टोला
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement