सेंद्रिय खतांची निर्मिती घरच्या घरी कशी करावी? शेतकऱ्यांनी सोपी आणि किफायतशीर पद्धत जाणून घ्या

Last Updated:

शेती उत्पादनात वाढ व मातीची सुपीकता टिकवण्यासाठी रासायनिक खतांच्या तुलनेत सेंद्रिय खतांचा वापर अधिक फायदेशीर ठरतो. हिवाळ्याच्या काळात पिकांना पोषक तत्त्वांचा योग्य पुरवठा व्हावा यासाठी घरच्या घरी सेंद्रिय खत तयार करणे हे एक उत्तम पर्याय आहे.

+
घरच्या

घरच्या घरी सेंद्रिय खत निर्मिती कशी करावी याबद्दल माहिती जाणून घ्या 

शेती उत्पादनात वाढ व मातीची सुपीकता टिकवण्यासाठी रासायनिक खतांच्या तुलनेत सेंद्रिय खतांचा वापर अधिक फायदेशीर ठरतो. हिवाळ्याच्या काळात पिकांना पोषक तत्त्वांचा योग्य पुरवठा व्हावा यासाठी घरच्या घरी सेंद्रिय खत तयार करणे हे एक उत्तम पर्याय आहे. या प्रक्रियेमुळे शेतीचा खर्चही कमी होतो आणि पर्यावरणालाही हानी पोहोचत नाही.
सेंद्रिय खत निर्मितीची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. घरात उपलब्ध असलेले कचरा साहित्य जसे की भाज्यांचे अवशेष, फळांच्या साली, वाळलेली पाने, शेणखत आणि थोडी माती एकत्र करून खत तयार केले जाते. या सगळ्या घटकांचे प्रमाण योग्य ठेवणे महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ, 60 टक्के ओलसर साहित्य (भाज्यांचे व फळांचे अवशेष) आणि 40 टक्के कोरडे साहित्य (पाने, गवत, शेणखत) यांचे मिश्रण केल्यास उत्तम दर्जाचे खत तयार होते.
advertisement
या साहित्यासाठी प्लास्टिकचा ड्रम, सिमेंटची टाकी किंवा जमिनीतील खड्डा वापरता येतो. सर्व साहित्य थरावर थर रचून त्यावर थोडे पाणी शिंपडावे. नंतर त्या ठिकाणी आठवड्याला एकदा ढवळून हवा खेळती ठेवावी. साधारणतः 45 ते 60 दिवसांत हे मिश्रण कुजून नैसर्गिक खत तयार होते. तयार खत काळपट रंगाचे, गंधहीन आणि मोकळेसर पोताचे दिसते, हेच उत्तम गुणवत्तेचे सेंद्रिय खत असते.
advertisement
अशा पद्धतीने तयार केलेले सेंद्रिय खत गहू, हरभरा, भाजीपाला किंवा फुलझाडांसाठीही उपयुक्त ठरते. हे खत जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या वाढवते, पाण्याची धारणक्षमता सुधारते आणि रासायनिक खतांच्या अतिरेकामुळे झालेल्या मातीच्या नुकसानावर उपाय करते. शिवाय, या प्रक्रियेत शेतातील किंवा घरातील जैविक कचरा उपयोगात येत असल्याने पर्यावरणपूरक उपक्रमालाही चालना मिळते.
हिवाळ्याच्या काळात मातीतील ओलावा जपण्यासाठी व पोषक तत्त्वांचा समतोल राखण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर अत्यावश्यक आहे. रासायनिक खतांचा खर्च वाढत असताना सेंद्रिय खत घरच्या घरी तयार केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळतो. त्यामुळे या हंगामात प्रत्येक शेतकऱ्याने “घरगुती सेंद्रिय खत निर्मिती” ही सवय लावून घेतल्यास पर्यावरण, जमीन आणि उत्पन्न — या तिन्हींचा समतोल राखला जाऊ शकतो.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सेंद्रिय खतांची निर्मिती घरच्या घरी कशी करावी? शेतकऱ्यांनी सोपी आणि किफायतशीर पद्धत जाणून घ्या
Next Article
advertisement
What is PADU:  राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत कधी होणार वापर
राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत क
  • मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान आता काही तास उरले आहेत.

  • निवडणूक आयोगाकडून पाडू (PADU) या यंत्राचा वापर करण्यात येणार आहे.

  • राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडेतोड टीका केली.

View All
advertisement