Jalgaon: शेतात पेरणी करताना वीज पडली, तिघे जागीच गेले, दोन गंभीर जखमी
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Jalgaon News: जळगावमध्ये वीज पडून तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहे.
जळगाव: जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातल्या कोंगानगर शिवारात वीज पडून तीन जण ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लखन दिलीप पवार, दशरथ उदल पवार व समाधान प्रकाश राठोड असे मृतांची नावे असून दिलीप उदल पवार व उदर गणपत पवार हे दोन जण गंभीर जखमी झाले आहे. चाळीसगावच्या रुग्णालयात जखमींना तातडीने दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह प्रशासकीय अधिकारी शासकीय रुग्णालयात दाखल झाले असून या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यावर मोठी शोककळा पसरली आहे.
advertisement
शेतात पेरणी करत असताना वीज पडल्याने घडली घटना
मयत पवार आणि राठोड हे शेतात पेरणी करत होते. त्याचवेळेस शेतात वीज पडली. झालेल्या दुर्घटनेत तिघांचे जागीच प्राण गेले तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. डॉक्टरांचा चमू त्यांच्यावर उपचार करीत आहे.
view commentsLocation :
Jalgaon,Maharashtra
First Published :
June 15, 2025 8:12 PM IST


