advertisement

Manoj Jarange : 'मला त्रास होतोय, पोटात पाणी नाही पण..'; जरांगे पाटील भावुक

Last Updated:

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे.

News18
News18
जालना, 28 ऑक्टोबर, सिद्धार्थ गोदाम : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी चाळीस दिवसांचा वेळ दिला होता. मात्र चाळीस दिवसांत आरक्षण न मिळाल्यानं जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. त्यांनी आज पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते भावूक झाले. मला त्रास होत आहे. पोटात पाणी नसल्यानं अडचण येत आहे. पण माझ्या त्रासापेक्षा समाजाचा त्रास मोठा आहे, त्यामुळे मी माझ्या त्रासाकडे लक्ष देणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, कुणीही मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करू नका. मराठी समाजाला तातडीनं आरक्षण द्यावं, हे सरकारला माझं शेवटचं सांगणं आहे. संपूर्ण गावांनी उपोषणात सहभागी व्हावं. जीथे साखळी उपोषण सुरू आहे, तिथे अमरण उपोषण सुरू करा. उद्यापासून पाणी पेऊन उपोषणाला बसा, उद्यापासून हजारो लोक अमरण उपोषणाला बसतील. उपोषणात कोणाचा जीव गेल्यास त्याची जबाबदारी सरकारची असेल असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
advertisement
संपूर्ण गाव एकजुटीनं एकत्र या, उपोषणाला बसा. कोणताही नेता आपल्या दारात आला नाही पाहिजे. तुम्हीही कोणत्या नेत्याच्या दारात जाऊ नका, असं आवाहानही यावेळी मराठा समाजाला जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आलं आहे. आंदोलन शांततेत करा, कोणीही उग्र आंदोलन करू नका असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Manoj Jarange : 'मला त्रास होतोय, पोटात पाणी नाही पण..'; जरांगे पाटील भावुक
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement