Rahul Gandhi: 'भारतात चीनी टँकने घुसखोरी केली...', राहुल गांधींच्या वक्तव्यावर लोकसभेत गदारोळ, विरोधक-सत्ताधाऱ्यात जुंपली
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Rahul Gandhi: सोमवारी लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या एका वक्तव्यावरून मोठा गदारोळ उडाला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.
नवी दिल्ली: सोमवारी लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या एका वक्तव्यावरून मोठा गदारोळ उडाला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेत भाग घेताना राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात चिनी रणगाडे भारतात घुसल्याचे सांगत केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या विधानावर तीव्र आक्षेप घेतला. त्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या आसनावरून उभे राहून त्यांचा दावा फेटाळून लावला. या दरम्यान विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी एक पुस्तक लिहिले होते, ज्यामध्ये चिनी घुसखोरीबद्दल हा दावा केला होता. संरक्षण मंत्र्यांनी असे कोणतेही पुस्तक प्रकाशित झालेले नाही असे उत्तर दिले. संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की विरोधी पक्षनेते सभागृहाची दिशाभूल करत आहेत. या मुद्द्यावर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षात दीर्घकाळ चर्चा झाली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षनेत्यांना त्या पुस्तकाचा उल्लेख न करण्याची सुचना केली. यासाठी त्यांनी नियमांचा हवाला दिला.
advertisement
राहुल गांधी वारंवार नरवणे यांचे नाव घेत होते. जेव्हा जेव्हा त्यांनी नरवणे यांचे नाव घेतले तेव्हा सत्ताधारी पक्षाचे सदस्य आक्षेप घेऊ लागले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अनेक वेळा आपल्या आसनावरून उभे राहिले. अमित शाह देखील अनेक वेळा आपल्या आसनावरून उभे राहिले आणि विरोधी पक्ष सदस्यांना तथ्यांसह बोलण्याचे आवाहन केले.
advertisement
गोंधळाच्या दरम्यान, सभापती ओम बिर्ला म्हणाले की सदस्य त्यांच्या भाषणात मासिके किंवा पुस्तकांचा संदर्भ घेऊ शकत नसल्याचे नियमांचा हवाला देत म्हणाले. त्यानंतर राहुल गांधी यांनी पाकिस्तान-चीनचे नाव घ्यायचे नाही का, असा सवाल केला. तुम्हीच सांगा भाषण कसे करायचे असेही राहुल गांधी यांनी म्हटले.
दोन्ही बाजूने गदारोळ वाढल्यानंतर लोकसभेचे कामकाज दुपारी ३ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.
advertisement
राहुल गांधी उल्लेख करत असलेले पुस्तक कोणते?
माजी लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी "फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी" नावाचे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात २०२० मध्ये लडाख आणि गलवान खोऱ्यात चीनसोबत झालेल्या संघर्षाची सर्वसमावेशक माहिती देण्यात आल्याचा दावा केला आहे. या पुस्तकात लष्कर आणि सरकारमधील उच्च पातळीवर घेतलेल्या निर्णयांबद्दल अनेक दावे करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. तथापि, हे पुस्तक आजपर्यंत प्रकाशित झालेले नाही. संरक्षण मंत्रालय या पुस्तकाचा आढावा घेत आहे, जे उच्च संरक्षण अधिकाऱ्यांद्वारे पुस्तके प्रकाशित करण्यासाठी एक मानक पद्धत आहे. हे पुस्तक मूळतः खूप पूर्वी प्रकाशित होणार होते, परंतु अंतिम मंजुरीअभावी ते प्रकाशित झालेले नाही. राहुल गांधी यांना या पुस्तकाबाबत एका मासिकात छापलेल्या भागाचा उल्लेख केला.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
Feb 02, 2026 2:44 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Rahul Gandhi: 'भारतात चीनी टँकने घुसखोरी केली...', राहुल गांधींच्या वक्तव्यावर लोकसभेत गदारोळ, विरोधक-सत्ताधाऱ्यात जुंपली









