सांगलीतील 25000 शेतकरी 'पीएम किसान योजने'च्या पैशांपासून वंचित, शासनाची 'ही' अट केली नव्हती पूर्ण!

Last Updated:

सांगली जिल्ह्यात पीएम किसान सन्मान योजनेचा 20 वा हप्ता नुकताच जमा झाला आहे, ज्यामुळे 80 कोटी 14 लाख रुपये वितरित झाले. मात्र, ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे...

PM kisan Yojana
PM kisan Yojana
सांगली :  केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ सांगली जिल्ह्यातील 4 लाख 730 शेतकरी घेत आहेत. या योजनेचा 20 वा हप्ता नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला असून, यामुळे जिल्ह्यामध्ये 80 कोटी 14 लाख 60 हजार रुपये वितरित झाले आहेत. मात्र, ई-केवायसी (E-KYC) पूर्ण न केल्यामुळे जिल्ह्यातील 25 हजार शेतकरी या लाभापासून वंचित राहिले आहेत.
20 वा हप्ता वितरित, पण अनेकांना लाभ नाही
पीएम किसान योजनेंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये जमा केले जातात. हा लाभ नियमितपणे मिळण्यासाठी दरवर्षी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. शासनाने वेळोवेळी आदेश देऊनही, जिल्ह्यांतील 25 हजार शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे त्यांना 20 व्या हप्त्यापासून वंचित राहावे लागले आहे.
advertisement
हप्ता न मिळण्याची प्रमुख कारणे
  • जमिनीच्या नोंदीतील त्रुटी : कागदपत्रे अपूर्ण असणे किंवा जमिनीच्या नोंदीत चुकीची माहिती असणे.
  • आधार लिंकिंग नाही : बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले नसणे.
  • पात्रता निकष पूर्ण नसणे : सरकारी नोकरी किंवा दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीन असणे.
  • तांत्रिक अडचणी : पोर्टलमध्ये काही तांत्रिक अडचणी असणे.
ई-केवायसी कुठे करायची?
जर तुम्ही अद्याप ई-केवायसी केली नसेल, तर ती पूर्ण करण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत
advertisement
  • ऑनलाइन : pmkisan.gov.in या वेबसाइटवर ‘ई-केवायसी’ (e-KYC) पर्याय निवडून आधार क्रमांकाद्वारे ओटीपी पडताळणी करा.
  • ऑफलाइन : जवळच्या कोणत्याही नागरिक सुविधा केंद्रात जाऊन बायोमेट्रिकद्वारे ई-केवायसी करता येते.
  • मोबाइल ॲप : पीएम किसान ॲपद्वारेही तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.
ही योजना केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केली असून, या योजनेंतर्गत दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
सांगलीतील 25000 शेतकरी 'पीएम किसान योजने'च्या पैशांपासून वंचित, शासनाची 'ही' अट केली नव्हती पूर्ण!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement