एन्काऊंटरआधी अक्षयचे शेवटचे शब्द काय होते, सांगताना आई ढसाढसा रडली
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Akshay Shinde and His Mother Last Conversation: आमच्या पोराला पैसे देऊन ठार मारलं आहे. माझ्या पोराची भरपाई द्या, नाहीतर आम्ही सुद्धा तिथे येतो, आम्हालाही गोळ्या मारा, असा आकांत अक्षयच्या आईने केला.
मुंबई : बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या पालकांनी पोलीस प्रशासन आणि शाळा प्रशासनावर गंभीर आरोप करत त्यांच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केले आहेत. अक्षयला पिचकारी वापरायची माहिती नव्हती, तो गोळीबार काय करणार? असे म्हणत अक्षयला पैसे देऊन मारले आहे, असा सनसनाटी आरोप त्याच्या आई आणि वडिलांनी केला आहे. अक्षयच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर त्याच्या आई वडिलांनी अक्षरश: हंबरडा फोडला.
अक्षयवरील आरोप खोटे आहे. माझ्या मुलाला पैसे देऊन ठार मारलं आहे. मी अक्षयला ३.३० वाजता जेलमध्ये भेटलो होतो. त्याला रंगाची पिचकरी कशी वापरायची हे सुद्धा माहिती नव्हतं, तो पोलिसांची बंदूक घेऊन कशी फायरिंग करेन असा प्रश्न त्यांनी विचारला.
advertisement
एन्काऊंटरआधी अक्षयचे शेवटचे शब्द काय होते? अक्षय आणि त्याच्या आईची आज (सोमवारी) दुपारीच जेलबाहेर भेट
"मी माझ्या पोरासोबत बोलेले होते. माझं आरोपपत्र आलंय का, मला कधी सोडणार असं तो विचारत होता. मी त्याला बोलले, थोडं थांब. त्याच्या हातामध्ये काही तरी कागद सुद्धा लिहून दिला होता. मम्मी हे नेमकं काय आहे? असं कागद दाखवून तो विचारत होता. आम्हाला काही वाचता लिहिता येत नाही" असं सांगताना अक्षयची आई ढसाढसा रडली.
advertisement
आमच्या पोराला पैसे देऊन ठार मारलं आहे. माझ्या पोराची भरपाई द्या, नाहीतर आम्ही सुद्धा तिथे येतो, आम्हालाही गोळ्या मारा. आम्ही पण मरायला तयार आहोत, अशा उद्विग्न भावना अक्षयच्या आईने व्यक्त केल्या.
आम्हाला बदलापूरमधील घरातून हाकलून दिलं आहे. स्टेशनवर आम्ही राहतोय. माझा पोरगा असं करूच शकत नाही. शाळेमध्ये दुसरं कुणी तरी केलं आहे. त्याच्यावर आरोप लावला आहे. १२, १३ तारखेला ही घटना घडली. पण माझं पोरगं १७ तारखेला शाळेत गेला होता. हे जर माहिती असतं तर तो शाळेत गेला नसता. माझं पोरगं गरीब गाय आहे. त्याला अशा कोणत्याही सवयी नाहीत, असं अक्षयची आई म्हणाली.
advertisement
पोलीस काहीही म्हणतील, पोरगं माझं फटाके सुद्धा फोडत नव्हता. गाड्यांना सुद्धा घाबरत होता. आता आम्हाला सुद्धा गोळ्या टाकून ठार मारून टाका. आम्ही पण मरणार त्याच्यासोबत. आम्ही एक वेळचं कमावून खाणारे लोक आहोत. शाळेत अजूनही लोक आहेत, जे पळून गेले त्यांना का अटक करत नाहीत? असा सवालही अक्षयच्या आईने विचारला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 23, 2024 9:16 PM IST


