नव्या दमाची हिरकणी! मुलांना वाचवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढली; मानेत काचा घुसल्या, तरी लावली जीवाची बाजी, काय घडलं?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
यमुना एक्सप्रेसवेवरील अपघातात पार्वती यांनी धाडसाने प्राची आणि सनीला वाचवले, पण स्वतः जळत्या बसमध्ये अडकल्या. गोविंद पत्नीचा शोध घेत आहेत, मुलं आईसाठी व्याकुळ.
यमुना एक्सप्रेसवेवर मंगळवारी पहाटे दाट धुक्यात जो भीषण अपघात झाला, हा फक्त एक अपघात नव्हता तर ती एका आईच्या असीम त्यागाची आणि धैर्याची काळजाला थरकाप उडवणारी कहाणी ठरली हे संपूर्ण देशानं पाहिलं. हमीरपूर जिल्ह्यातील राठ येथील रहिवासी असलेल्या ४२ वर्षीय पार्वती यांनी आपल्या पोटच्या गोळ्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं, पण स्वतः मात्र त्या अग्नितांडवात कुठे हरवल्या त्या अजूनही सापडल्या नाहीत, मुलांच्या डोळ्यासमोर फक्त आग आणि त्या चारही बाजूनं आगीत अडकलेली त्यांची आई त्यांना दिसत आहे.
मृत्यूशी झुंज अन् मायेचा पदर
पहाटे ४ च्या सुमारास बलदेव परिसरात 8 बसची जोरदार धडक झाली. स्फोटचा आवाज आला धूर निघाला आणि काही क्षणातच बसने पेट घेतला. आग बघता बघता इतर गाड्यांमध्येही पसरली. या डबल डेकर बसमधून पार्वती आपली मुलगी प्राची १२ वर्षांची आणि सनी मुलगा८ वर्षांचा यांच्यासह पतीकडे नोएडाला जात होत्या. आग लागताच प्रवाशांची पळापळ सुरू झाली. आग लागल्याने सगळं संपलं असं वाटत असताना पार्वती यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता, डोक्याने बसच्या खिडकीची काच फोडली. काचेचे तुकडे त्यांच्या मानेत घुसले, रक्त वाहू लागलं, पण आई शांत बसली नाही. त्यांनी आधी प्राचीला खिडकीतून सुरक्षित बाहेर काढलं आणि मग सनीला. मुलांचे प्राण वाचले, पण दुर्दैवाने पार्वती स्वतः मात्र त्या जळत्या बसमध्ये अडकल्या.
advertisement
डोळ्यांत आसवं अन् शोध सुरूच...
पार्वती यांचे पती गोविंद हे नोएडामध्ये राजमिस्त्रीचे काम करतात. पत्नी आणि मुलांच्या अपघाताची बातमी मिळताच ते मथुरामध्ये पोहोचले. जिल्हा रुग्णालय, वृंदावन रुग्णालय आणि अगदी शवविच्छेदन गृहातही ते आपल्या लाडक्या पत्नीचा शोध घेत आहेत. "पार्वती कुठे आहे? जिवंत असेल तर कोणत्या परिस्थितीत आहे? आणि जर नसेल... तर तिचं शरीर कुठे आहे?" हे प्रश्न विचारताना गोविंद यांच्या डोळ्यांतील अश्रू थांबण्याचे नाव घेत नाहीत.
advertisement
मुलांच्या जखमा आणि आईची आठवण
सोमवारी संध्याकाळी पार्वती आपल्या दोन्ही मुलांसह बसमध्ये बसल्या होत्या. अपघातानंतर मुले कशीबशी दुसऱ्या बसने घरी पोहोचली. मुलगी प्राचीच्या कमरेला गंभीर इजा झाली आहे, तर चिमुकल्या सनीच्या डोक्याला मार लागला आहे. पण या जखमांपेक्षाही आईला जळत्या बसमध्ये अडकलेलं बघून मुलं जास्त बिथरली आहेत. पार्वती यांचा मोबाईल फोन तेव्हापासून बंद येत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 17, 2025 9:36 AM IST
मराठी बातम्या/देश/
नव्या दमाची हिरकणी! मुलांना वाचवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढली; मानेत काचा घुसल्या, तरी लावली जीवाची बाजी, काय घडलं?











