रिस्क घेतली अन् नोकरी सोडली, दुष्काळी भागात शेती करुन कमावले 1300000!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Pomegranate Farming: खासगी क्षेत्रातील नोकरी सोडून सांगलीच्या तरुणाने डाळिंबाची शेती केलीये. या डाळिंब शेतीतून वर्षाला 13 लाख रुपयांची कमाई होतेय.
अवर्षणप्रवण भागात शेती करणे तसे आव्हानात्मकच असते. मात्र, प्रयोगशीलता व सचोटीने काही शेतकरी चांगले उत्पन्न मिळवत आहेत. सांगली जिल्ह्यातील जत तालुका दुष्काळी मानला जातो. मात्र येथील प्रयोगशील शेतकरी पांडुरंग सावंत यांनी आधुनिक शेतीचा मार्ग पत्करत डाळिंबाची शेती केलीये. अगदी कमी खर्चात त्यांनी 2 एकर क्षेत्रावर डाळिंबाची बाग फुलवली असून यातून ते लाखोंचे उत्पन्न घेत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
औषधे, रोजगार आणि बाजारपेठेचे अचूक नियोजन करत दुष्काळी भागातील सावंत यांनी डाळिंब पिकातून दिमाखदार भरारी घेतली आहे. त्यांच्या डाळिंब बागेतून प्रतिवर्षी चांगले उत्पादन निघते. बाजारपेठेची स्थिती योग्य असेल तेव्हाच ते हार्वेस्टिंग करतात. प्रतिवर्षी सरासरी 13 लाखांचे उत्पन्न मिळत असल्याचे सावंत सांगतात.
advertisement
advertisement


