...तर मुंबईतला मराठी माणूस नाहीसा होईल; असं का म्हणाले महेश मांजरेकर?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Mahesh Manjrekar : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत महेश मांजरेकरांनी वक्तव्य केलं आहे. तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे माझा मित्र असल्याचंही ते म्हणाले.
advertisement
महेश मांजरेकर म्हणाले,"राज ठाकरेचा जेव्हा मी पॉडकास्ट केला तेव्हा मी त्याला पहिला प्रश्न हाच विचारलेला की कोणतं साल उजाडेल तेव्हा मुंबईतला मराठी माणूस नाहीसा होईल. मला हे विचारावसं वाटलं कारण आज जेव्हा मी लोअर परेलला जातो तेव्हा असवस्थ व्हायला होतं. कारण लालबाग-परळ मराठ्यांचा बालेकिल्ला होता. मराठी माणसाला बाहेरच काढलं गेलंय. आता तिथल्या प्लॅटची किंमत 110 कोटींच्या आसपास आहे. मराठी माणूस बदलापूरला गेलाय. बीकेसीमध्ये एक झोपडी दीड कोटींत आहे. त्यामुळे मला वाटतं या दोन्ही भावांनी एकत्र येऊन मराठी माणसाचा मुद्दा हाती घ्यावा.
advertisement
राज ठाकरे आणि महेश मांजरेकर एकमेकांचे खास मित्र आहेत. याबाबत बोलताना महेश मांजरेकर म्हणाले,"राज ठाकरे माझा मित्र आहे. राजकारणाची मला खूप आवड होती. अशोक चव्हाण आणि मी एकत्र कॉलेजमध्ये होतो. तेव्हापासून मी राजकारण जवळून पाहिलं आहे. तोंड बंद कधी करायचं मला कळत नाही म्हणून मी राजकारणात नाही. राज ठाकरे कायम माझ्या पाठीशी असतो".
advertisement
advertisement
advertisement
advertisement


