कोर्टात डिवोर्स केस अन् 11 वर्षांनी लहान मुलीच्या प्रेमात पडलेला मराठी अभिनेता, भन्नाट लव्ह स्टोरी
- Published by:Minal Gurav
Last Updated:
खरं प्रेम कोणाला कधी सापडेल हे सांगता येत नाही. प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या आयुष्यातही असंच काहीसं झालं. एक संसार मोडला. कोर्टात डिवोर्सची केस सुरू असताना अभिनेत्याला बाहेर खरं प्रेम भेटलं. कोर्टात डिवोर्सची केस आणि अभिनेता 11 वर्षांनी लहान मुलीच्या प्रेमात पडला.
advertisement
आरपारला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सुनील तावडे यांनी सांगितलं, "माझा एक डिवोर्स झाला. 1985 ला एका मुलीच्या प्रेमात पडलो. ती नाटकात काम करायची. पुढे जाऊन तिच्याशीच लग्न केलं. माझा डिवोर्स झाल्यानंतरची चार वर्षांची प्रोसेस होती. काय करायचं काय कळत नाही. डिवोर्स तर मिळत नाही. आयुष्य तर चाललंय पुढे."
advertisement
advertisement
सुनील तावडे यांनी पुढे सांगितलं, "कॉफी प्यायला गेल्यावर मी त्यांची चौकशी केली. तिचे वडिल खूप विनोदी होते. मला खूप आवडले. ते सुद्धा नकलाकार होते. मेहुणा होता माझा. तिच्या वडिलांशी आणि आता जो माझा मेहुणा आहे. त्यांच्याशी गप्पा मारून खूपच भारी वाटलं होतं. त्यादिवशी मी घरी जाऊन सांगितलं होतं की आज मी आयुष्यात खूप छान लोकांना भेटलोय. आधी मला तिचे वडिल आवडले आणि मग मुलगी आवडली."
advertisement
"एकदिवशी मी सांगितलं स्पष्टपणे. तिला कळलं की हा प्रेमात आहे. तेव्हा तसं नव्हतं की डायरेक्ट जाऊन सांगितलं. हळू हळू सांगितलं. मग घरी सांगू लागलो. त्याआधी मी तिची खूप सेवा केली. तिच्या इम्प्रेशन पाडण्यासाठी तिच्या घराजवळचाच हॉल बुक केला. खुर्चा उचलण्यापासून काम केलं जेणेकरून इम्प्रेशन पडलं पाहिजे. त्यानंतर म्हटलं यांना खरं सांगायला हवं. त्यावेळी माझी केस सुरू होती. सांगितल्यानंतर तिला खूप धक्का बसला. मी जे काही खरंय ते तिच्या कुटुंबीयांना सांगितलं."
advertisement
advertisement
"सोनालीने हे तिच्या घरी सांगितलं. तिच्या घरचे म्हणाले, 'ठिके काहीच हरकत नाही' जर तुझ्या बाबतीत असं घडलं असतं तर? त्यांच्या घरात 14 लोक राहत होते.ती एकत्र कुटुंबात ती लहानाची मोठी झाली होती. म्हणूनच मी सुद्धा सोनालीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कारण ती पुढे जाऊन माझ्याही कुटुंबात अशाचप्रकारे मिळून मिसळून राहील."
advertisement
advertisement
"घरचं वातावरण तिचा स्वभाव हे तिच्या प्रेमात पडण्याचं मुख्य कारण होतं. आणि माणसाला एकदा ठेच लागली की माणूस जास्त शहाणा होतो. मी माझ्या बायकोलाही सांगितलं होतं की मी तीन मुली पाहून ठेवल्या होत्या. माझ्या आत्याने मला सांगितलं होतं की, नीट विचार करून निर्णय घे. मी लग्न करताना भरपूर विचार करून निर्णय घेतला होता."








