'...अन् ते पुन्हा कधीच उठले नाहीत', मृत्यूच्यावेळी राज कपूर यांची झालेली भयानक अवस्था, स्वतः राष्ट्रपतींना मोडावा लागला प्रोटोकॉल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Raj Kapoor Birth Anniversary: राज कपूर यांच्या शेवटच्या दिवसांची आठवण आजही बॉलिवूडला हळहळायला लावते. त्यांच्या अभिनय, निर्मिती आणि दिग्दर्शनाने भारतीय सिनेमावर एक अमिट छाप सोडली, पण त्यांचा शेवट मात्र खूपच दुर्दैवी ठरला.
advertisement
advertisement
advertisement
रीमा जैन यांनी सांगितलेले, "पापा ३० एप्रिलला मुंबईतून दिल्लीला पोहोचले. पण, त्यांचे विमान दिल्लीत उतरले, तेव्हा बाहेर प्रचंड धुळीचे वादळ सुरू होते. विमानाचा दरवाजा उघडताच, त्या धुळीच्या वाऱ्याने त्यांचे स्वागत केले." राज कपूर यांना दम्याचा त्रास होता. धुळीमुळे त्यांच्या फुफ्फुसांवर खूप ताण आला, ज्यामुळे त्यांची तब्येत अचानक बिघडली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
रीमा पुढे म्हणाल्या, "त्यानंतर पापांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आणि त्यांचे शेवटचे दिवस खूप वेदनादायी ठरले." २ जून १९८८ रोजी वयाच्या ६३ व्या वर्षी राज कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला. 'दादासाहेब फाळके' पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिल्लीला गेलेले ते 'ग्रेट शो मॅन' पुन्हा कधीच आपल्या घरी परतले नाहीत.









