पुरी तळल्यानंतर उरलेल्या तेलाचं तुम्ही काय करता? अनेक महिला करतात 'या' चूका, ही आहे तेल वापरण्याची योग्य पद्धत
- Published by:Devika Shinde
Last Updated:
बहुतांश वेळा लोक ते तेल फेकून देतात किंवा पुन्हा पुन्हा गरम करून वापरतात, जे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. पण जर हे तेल योग्य पद्धतीने साठवलं आणि पुन्हा वापरलं, तर ते सुरक्षित राहते आणि वाया जाणारं तेलही वाचतं. फक्त काही सोप्या गोष्टींचं भान ठेवणं गरजेचं आहे.
आपल्या घरात अनेकदा शक्यतो सणासुदीला पुरी, भजी, वडे किंवा इतर काही तेलकट पदार्थ बनवले जातात, तेव्हा कढईत बरेच तेल उरते. बहुतांश वेळा लोक ते तेल फेकून देतात किंवा पुन्हा पुन्हा गरम करून वापरतात, जे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. पण जर हे तेल योग्य पद्धतीने साठवलं आणि पुन्हा वापरलं, तर ते सुरक्षित राहते आणि वाया जाणारं तेलही वाचतं. फक्त काही सोप्या गोष्टींचं भान ठेवणं गरजेचं आहे.
advertisement
advertisement
advertisement
तेल साठवण्याची योग्य पद्धततेल नेहमी स्टील किंवा काचच्या एअरटाइट डब्यात ठेवा. प्लास्टिकच्या भांड्यात तेल ठेवू नका, कारण त्यातून रासायनिक प्रतिक्रिया होऊ शकते. तेल थंड आणि अंधाऱ्या जागी ठेवा; गॅसच्या जवळ किंवा थेट उन्हात ठेवल्यास त्याचा स्वाद आणि गुणधर्म बिघडतात.तसेच, वेगवेगळ्या तेलांचा गोंधळ करू नका. राईचं तेल राईच्याच तेलासोबत, रिफाइंड रिफाइंडसोबतच ठेवा. यामुळे त्या तेलाचा मूळ स्वाद आणि गुणवत्ता टिकून राहते.
advertisement
तेल पुन्हा वापरण्याआधी त्याच्या आधी थोडा वास घेऊन बघा.जर तेलाला जळलेला आंबूस किंवा विचित्र वास येत असेल, तर ते लगेच फेकून द्या.असं तेल शरीरात फ्री रॅडिकल्स निर्माण करतं, जे हृदय, यकृत आणि त्वचेवर वाईट परिणाम करू शकतात.साफ आणि ताजा वास असलेलं तेल तुम्ही भाजी, पराठे किंवा तडका देण्यासाठी वापरू शकता.परंतु, तेल दोनपेक्षा जास्त वेळा गरम करू नका, कारण वारंवार गरम केल्याने त्यातील ट्रान्स फॅट वाढतं, जे आरोग्यासाठी घातक असतं.
advertisement
advertisement
advertisement


