Fruits vs Vegetables : फळं की भाज्या आरोग्यासाठी जास्त काय चांगलं? 99 टक्के लोकांचा चुकीचा समज

Last Updated:
फळं आणि भाज्या दोन्हीही आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या आहेत, पण अनेकदा मनात प्रश्न येतो की “फळं जास्त फायदेशीर का भाज्या?” चला तर मग, या दोन्हींच्या फायद्यांबद्दल जाणून घेऊया.
1/8
आपलं आरोग्य चांगलं असेल तर मग कोणतंच आजारपण जवळ येत नाही.  त्यामुळे नेहमीच आपल्याला चांगल्या भाज्या आणि आहार घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. आपलं शरीर तंदुरुस्त, ऊर्जावान आणि निरोगी ठेवायचं असेल, तर रोजच्या आहारात फळं आणि भाज्या या दोन्ही गोष्टींचा समावेश करणं अत्यावश्यक आहे.
आपलं आरोग्य चांगलं असेल तर मग कोणतंच आजारपण जवळ येत नाही. त्यामुळे नेहमीच आपल्याला चांगल्या भाज्या आणि आहार घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. आपलं शरीर तंदुरुस्त, ऊर्जावान आणि निरोगी ठेवायचं असेल, तर रोजच्या आहारात फळं आणि भाज्या या दोन्ही गोष्टींचा समावेश करणं अत्यावश्यक आहे.
advertisement
2/8
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपण फास्ट फूड, पॅकेज्ड स्नॅक्स आणि जंक फूडकडे जास्त झुकतो, पण खरी ताकद आणि पोषण आपल्याला निसर्गातूनच मिळतं. म्हणजेच फळं आणि भाज्यांमधून. दोन्हीही आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या आहेत, पण अनेकदा मनात प्रश्न येतो की “फळं जास्त फायदेशीर का भाज्या?” चला तर मग, या दोन्हींच्या फायद्यांबद्दल जाणून घेऊया.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपण फास्ट फूड, पॅकेज्ड स्नॅक्स आणि जंक फूडकडे जास्त झुकतो, पण खरी ताकद आणि पोषण आपल्याला निसर्गातूनच मिळतं. म्हणजेच फळं आणि भाज्यांमधून. दोन्हीही आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या आहेत, पण अनेकदा मनात प्रश्न येतो की “फळं जास्त फायदेशीर का भाज्या?” चला तर मग, या दोन्हींच्या फायद्यांबद्दल जाणून घेऊया.
advertisement
3/8
हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, फळं आणि भाज्यांमध्ये विटामिन्स, मिनरल्स आणि फायबरचं प्रमाण मुबलक असतं. फळांमध्ये नैसर्गिक साखर (नेचरल शुगर) असते, जी शरीराला झटपट ऊर्जा देते. तर भाज्यांमध्ये साखरेचं प्रमाण कमी असतं आणि त्यात फायबर, आयर्न, कॅल्शियम आणि अँटिऑक्सिडंट्सचं प्रमाण अधिक असतं. हे घटक दीर्घकाळासाठी शरीराच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतात.
हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, फळं आणि भाज्यांमध्ये विटामिन्स, मिनरल्स आणि फायबरचं प्रमाण मुबलक असतं. फळांमध्ये नैसर्गिक साखर (नेचरल शुगर) असते, जी शरीराला झटपट ऊर्जा देते. तर भाज्यांमध्ये साखरेचं प्रमाण कमी असतं आणि त्यात फायबर, आयर्न, कॅल्शियम आणि अँटिऑक्सिडंट्सचं प्रमाण अधिक असतं. हे घटक दीर्घकाळासाठी शरीराच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतात.
advertisement
4/8
फळांबद्दल बोलायचं झालं तर, ती व्हिटॅमिन C, पोटॅशियम आणि फाइटोन्युट्रिएंट्सचा उत्तम स्रोत आहेत. संत्रं, पेरू आणि कीवी हे इम्युनिटी वाढवतात, तर सफरचंद आणि केळं पचनसंस्थेला सुधारतात आणि हृदयाचं आरोग्य टिकवतात.
फळांबद्दल बोलायचं झालं तर, ती व्हिटॅमिन C, पोटॅशियम आणि फाइटोन्युट्रिएंट्सचा उत्तम स्रोत आहेत. संत्रं, पेरू आणि कीवी हे इम्युनिटी वाढवतात, तर सफरचंद आणि केळं पचनसंस्थेला सुधारतात आणि हृदयाचं आरोग्य टिकवतात.
advertisement
5/8
दुसरीकडे, हिरव्या पालेभाज्या जसे की मेथी, पालक, ब्रोकली, फुलकोबी आणि बीन्स या शरीरासाठी डिटॉक्स एजंटचं काम करतात. या भाज्या वजन नियंत्रणात ठेवायला, बद्धकोष्ठता कमी करायला आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकायला मदत करतात. शिवाय, भाज्यांमधील कमी कॅलरीमुळे त्या वजन कमी करण्यासाठीही उत्तम पर्याय ठरतात. नियमितपणे भाज्या खाल्ल्याने हृदयरोग, कर्करोग आणि उच्च रक्तदाबासारख्या आजारांपासूनही संरक्षण मिळतं. दररोज किमान 3 ते 5 वाट्या भाज्या खाण्याची सवय ठेवावी, असं तज्ज्ञांचं मत आहे.
दुसरीकडे, हिरव्या पालेभाज्या जसे की मेथी, पालक, ब्रोकली, फुलकोबी आणि बीन्स या शरीरासाठी डिटॉक्स एजंटचं काम करतात. या भाज्या वजन नियंत्रणात ठेवायला, बद्धकोष्ठता कमी करायला आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकायला मदत करतात. शिवाय, भाज्यांमधील कमी कॅलरीमुळे त्या वजन कमी करण्यासाठीही उत्तम पर्याय ठरतात. नियमितपणे भाज्या खाल्ल्याने हृदयरोग, कर्करोग आणि उच्च रक्तदाबासारख्या आजारांपासूनही संरक्षण मिळतं. दररोज किमान 3 ते 5 वाट्या भाज्या खाण्याची सवय ठेवावी, असं तज्ज्ञांचं मत आहे.
advertisement
6/8
फळं आणि भाज्यांची तुलना केली, तर अनेक बाबतीत भाज्या थोड्या अधिक फायदेशीर ठरतात. कारण त्यामध्ये साखर कमी आणि फायबर अधिक असतं. त्या शरीराला दीर्घकाळ पोषण देतात आणि ऊर्जाही टिकवून ठेवतात. मात्र, फळंही आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत. ती शरीराला त्वरीत ऊर्जा आणि आवश्यक पोषक तत्वं देतात.
फळं आणि भाज्यांची तुलना केली, तर अनेक बाबतीत भाज्या थोड्या अधिक फायदेशीर ठरतात. कारण त्यामध्ये साखर कमी आणि फायबर अधिक असतं. त्या शरीराला दीर्घकाळ पोषण देतात आणि ऊर्जाही टिकवून ठेवतात. मात्र, फळंही आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत. ती शरीराला त्वरीत ऊर्जा आणि आवश्यक पोषक तत्वं देतात.
advertisement
7/8
डायबिटीज असलेल्या लोकांनी मात्र फळांचं सेवन करताना काळजी घेणं गरजेचं आहे. फळं नाश्त्यात किंवा मधल्या वेळच्या स्नॅकमध्ये घेता येतात, तर भाज्या मुख्य जेवणात समाविष्ट कराव्यात. असं केल्याने शरीराला संतुलित पोषण मिळतं आणि अनेक आजारांपासून आपलं रक्षण होतं.
डायबिटीज असलेल्या लोकांनी मात्र फळांचं सेवन करताना काळजी घेणं गरजेचं आहे. फळं नाश्त्यात किंवा मधल्या वेळच्या स्नॅकमध्ये घेता येतात, तर भाज्या मुख्य जेवणात समाविष्ट कराव्यात. असं केल्याने शरीराला संतुलित पोषण मिळतं आणि अनेक आजारांपासून आपलं रक्षण होतं.
advertisement
8/8
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी त्याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी त्याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement