Health Tips: लहान मुलांचे सतत दुखतंय पोट, वेळीच करा उपाय, 5 महत्त्वाच्या टिप्स

Last Updated:
लहान मुलांमध्ये पोटदुखी ही एक सामान्य परंतु त्रासदायक समस्या आहे. मुलांना पचनसंस्थेचे विकार लवकर होतात कारण त्यांची पचनक्रिया अजून विकसित होत असते.
1/7
लहान मुलांमध्ये पोटदुखी ही एक सामान्य परंतु त्रासदायक समस्या आहे. मुलांना पचनसंस्थेचे विकार लवकर होतात कारण त्यांची पचनक्रिया अजून विकसित होत असते.
लहान मुलांमध्ये पोटदुखी ही एक सामान्य परंतु त्रासदायक समस्या आहे. मुलांना पचनसंस्थेचे विकार लवकर होतात कारण त्यांची पचनक्रिया अजून विकसित होत असते.
advertisement
2/7
 अन्न बदल, अस्वच्छ पाणी, गॅस, कृमी किंवा अतिसार यामुळे पोटात दुखू शकते. यामुळे पालकांनी वेळीच योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.
अन्न बदल, अस्वच्छ पाणी, गॅस, कृमी किंवा अतिसार यामुळे पोटात दुखू शकते. यामुळे पालकांनी वेळीच योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.
advertisement
3/7
पोटात गॅस किंवा अपचन झाल्यास, ओव्याचं पाणी किंवा हिंगाचा लेप उपयोगी ठरतो. हिंग पाण्यात मिसळून नाभीभोवती लावल्याने आराम मिळतो.
पोटात गॅस किंवा अपचन झाल्यास, ओव्याचं पाणी किंवा हिंगाचा लेप उपयोगी ठरतो. हिंग पाण्यात मिसळून नाभीभोवती लावल्याने आराम मिळतो.
advertisement
4/7
तसंच हलका आहार, कोमट पाणी यामुळेही पोटदुखी कमी होते. मुलं जर रडत असतील, पोट धरून बसत असतील किंवा जेवण टाळत असतील तर ते गंभीर लक्षण असू शकते. अशावेळी घरगुती उपायांबरोबर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
तसंच हलका आहार, कोमट पाणी यामुळेही पोटदुखी कमी होते. मुलं जर रडत असतील, पोट धरून बसत असतील किंवा जेवण टाळत असतील तर ते गंभीर लक्षण असू शकते. अशावेळी घरगुती उपायांबरोबर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
advertisement
5/7
जर मुलाला अतिसार झाला असेल तर ओआरएस पावडरचे पाणी देणे गरजेचे आहे. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते. मुलांनी सतत सैल शौच करत असल्यास, सुस्ती जाणवत असल्यास किंवा ताप असल्यास तातडीने डॉक्टरांकडे घेऊन जाणं आवश्यक आहे. मुलांच्या शरीरात लवकर बदल होतात म्हणून थोडाही विलंब होऊ नये.
जर मुलाला अतिसार झाला असेल तर ओआरएस पावडरचे पाणी देणे गरजेचे आहे. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते. मुलांनी सतत सैल शौच करत असल्यास, सुस्ती जाणवत असल्यास किंवा ताप असल्यास तातडीने डॉक्टरांकडे घेऊन जाणं आवश्यक आहे. मुलांच्या शरीरात लवकर बदल होतात म्हणून थोडाही विलंब होऊ नये.
advertisement
6/7
कधी कधी पोटदुखीचे कारण कृमी (जंत) असते. त्यामुळे दर सहा महिन्यांनी जंतनाशक औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार देणं गरजेचं आहे. यामुळे पोट साफ राहतं आणि पचन सुधारतं. तसेच, मुलांच्या आहारात फायबरयुक्त फळं जसं की पपई, सफरचंद यांचा समावेश केल्यास पचनक्रिया सुरळीत राहते.
कधी कधी पोटदुखीचे कारण कृमी (जंत) असते. त्यामुळे दर सहा महिन्यांनी जंतनाशक औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार देणं गरजेचं आहे. यामुळे पोट साफ राहतं आणि पचन सुधारतं. तसेच, मुलांच्या आहारात फायबरयुक्त फळं जसं की पपई, सफरचंद यांचा समावेश केल्यास पचनक्रिया सुरळीत राहते.
advertisement
7/7
लहान मुलांच्या आरोग्यासाठी स्वच्छता सर्वाधिक महत्त्वाची आहे. मुलांना स्वच्छ पाणी, वेळेवर आणि पौष्टिक आहार आणि स्वच्छ हात यांची सवय लावावी. खेळून झाल्यावर आणि जेवणाआधी हात धुण्याची सवय लावल्यास संसर्गजन्य आजार टाळता येतात. पोटदुखी ही छोटी गोष्ट वाटत असली तरी योग्य वेळेस उपचार न घेतल्यास गंभीर आजारात रूपांतर होऊ शकते, त्यामुळे सजग राहणं आवश्यक आहे.
लहान मुलांच्या आरोग्यासाठी स्वच्छता सर्वाधिक महत्त्वाची आहे. मुलांना स्वच्छ पाणी, वेळेवर आणि पौष्टिक आहार आणि स्वच्छ हात यांची सवय लावावी. खेळून झाल्यावर आणि जेवणाआधी हात धुण्याची सवय लावल्यास संसर्गजन्य आजार टाळता येतात. पोटदुखी ही छोटी गोष्ट वाटत असली तरी योग्य वेळेस उपचार न घेतल्यास गंभीर आजारात रूपांतर होऊ शकते, त्यामुळे सजग राहणं आवश्यक आहे.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement