Weather Alert: कोकणातून मान्सूनची माघार, आता नवं संकट, ठाणे-मुंबईतून महत्त्वाचं अपडेट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातून पावसाचा जोर ओसरला असून कोकणातही उघडीप घेतली आहे. आता ऑक्टोबर हिटचे चटके जाणवत असून हवामानात मोठे बदल झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून ठाणे, नवी मुंबई आणि पालघर परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. परंतु, आता या भागांमध्ये पावसाने अखेर विश्रांती घेतली आहे. आज, 11 ऑक्टोबर रोजी संपूर्ण कोकण किनारपट्टीवर वातावरण शांत आणि स्थिर राहण्याची शक्यता असून, कुठेही मुसळधार पावसाचा इशारा नाही. हवामान विभागाने सर्व जिल्ह्यांमधील अलर्ट मागे घेतले आहेत.
advertisement
मुंबईत आजचे वातावरण एकदम स्वच्छ आणि आल्हाददायक आहे. गेल्या काही दिवसांपासून रिमझिम सरींचा अनुभव घेतलेल्या मुंबईकरांना आज थोडासा दिलासा मिळाला आहे. आकाशात थोडेसे ढग राहतील, परंतु पावसाची शक्यता फारच कमी आहे. तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस दरम्यान राहील, तर आर्द्रता किंचित जाणवेल.
advertisement
ठाणे आणि नवी मुंबई या भागात गेल्या दोन-तीन दिवसांपासून जोरदार सरी कोसळत होत्या. मात्र आज पावसाने विश्रांती घेतली असून वातावरणात शांतता परतली आहे. अधूनमधून हलक्या सरी येऊ शकतात, पण दिवसभर हवामान कोरडेच राहण्याची शक्यता आहे. तापमान 29 ते 31 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.
advertisement
पालघर जिल्ह्यात देखील आज हवामान स्थिर आहे. काही ग्रामीण भागांमध्ये सकाळी थोडासा हलका पाऊस दिसला, मात्र पुढील काळात पावसाचा जोर नाही. दिवसभर हवामान उबदार राहील आणि वाऱ्याचा वेग 8 ते 10 किमी प्रति तास इतका असेल.
advertisement
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग:कोकण किनारपट्टीवरील या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आज वातावरणात स्थिरता जाणवेल. गेल्या आठवड्यात सतत पाऊस होत असला तरी आता पावसाने पूर्ण विश्रांती घेतली आहे. आकाशात हलके ढग राहतील, परंतु मुसळधार पावसाची शक्यता नाही. समुद्रकिनारी हवामान आल्हाददायक असून, तापमान 28 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहील.