शेतकरी संपताना डोळ्यादेखत पाहिलं, नोकरी सोडली अन् बळीराजाच्या 70 लेकरांसाठी छत उभारलं!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
शेतकरी आत्महत्या म्हटलं की प्रत्येक जण हळहळतो. पण, पुढे कुणीच येत नाही. याला मूळचे परभणीचे असलेलं अशोक देशमाने अपवाद ठरले आहेत.
advertisement
advertisement
advertisement
देशमाने दाम्पत्याने गाव-खेड्यात मुलांच्या शिक्षणाचे होणारे हाल, त्या मुलांची हेंडसाळ थांबावी यासाठी बाबा आमटे आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारातून प्रेरित होऊन ही संस्था सुरु केली. आता देशमाने दाम्पत्य आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी पूर्णवेळ काम करत आहेत. सध्या जवळपास 70 ते 80 मुलं इथं शिकत आहे. पूर्वी 10 बाय 10 च्या रूम मध्ये हा प्रकल्प राबवला जात होता. आमचं हे काम पाहून डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कुलकर्णी या दाम्पत्याने आळंदी जवळची 2 एकर जागा दान केली आहे.
advertisement
advertisement
सुरुवातीला केवळ पत्र्याच्या छपराची बैठी इमारत असलेल्या संस्थेच्या आवारात आता तीन नवीन इमारती उभारल्या आहेत. शिवाय ग्रंथालय, प्रयोगशाळा, गोशाळा इथे आहेत. या मुलांबरोबरच आता वंचित मुलींचं शिक्षण आणि संगोपनाची व्यवस्था संस्थेत केली आहे. मुलांनी शिक्षण घेऊन उद्योजक बनावे, इतरांसाठी रोजगार निर्माण करावा यासाठी इथं शिक्षण व प्रोत्साहन दिलं जातं, असं देशमाने सांगतात.
advertisement
मुलांच्या मनावर बालपणापासून उद्योगाचे धडे बिंबवण्यासाठी शेतीशी निगडित तसेच इतर उद्योगांचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये मुलांना दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. मुलांना कनक मशीन, प्लम्बिंग, इलेक्ट्रिक, वेल्डिंगपासून भरतकामा पर्यंत सर्व शिकवले जाते. यासोबतच ग्लोबल क्लासरूम, मोफत फिरता दवाखाना, कामधेनू गोशाळा, वाचनालय, प्रयोगशाळा, ज्ञानछत्र, साखर शाळा, नवचेतना असे 'स्नेहवन'चे अन्य प्रकल्प देखील राबवले जातात, अशी माहिती अशोक व त्यांच्या पत्नी अर्चना यांनी दिली आहे.