Weather Alert : महाराष्ट्रावरील अवकाळी संकट कायम, गुरुवारी वादळी वार्यासह कोसळणार पाऊस, 32 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले असून राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी पाऊस, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पाहुयात विभागानुसार हवामानाचा अंदाज.
महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा धुमाकूळ पहायला मिळत आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झालं आहे. 2 एप्रिल रोजी हवामान विभागाने राज्यातील 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर 23 जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा दिला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले असून राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी पाऊस, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पाहुयात विभागानुसार हवामानाचा अंदाज.
advertisement
advertisement
पश्चिम महाराष्ट्रातील पुण्याला अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये जोरदार पावसासह ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर कोल्हापूरमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून येथे मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement









