Weather Alert : पुढील 24 तास धोक्याचे, महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळणार, 15 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राचा प्रभाव म्हणून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पाहुयात राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राचा प्रभाव म्हणून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यातील एकूण 15 जिल्ह्यांना हवामान विभागाने 4 ऑक्टोबर रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. पाहुयात राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये साधारणपणे ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे, तर कमाल तापमान 30 अंश सेल्शिअस किमान तापमान 24 अंश सेल्शिअसच्या दरम्यान असेल, तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही ढगाळ आकाशासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
विदर्भातील एकूण सात जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. यलो अलर्ट जारी असलेल्या या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होऊ शकतो.
advertisement