अक्षय्य तृतीया सुवर्ण मुहूर्त, तरी या दिवशी मुहूर्तावर पार पडणार नाही एकही लग्न! असं का?

Last Updated:
10 मे रोजी देशभरात अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जाईल. हा केवळ सण नाही, तर वर्षातल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक सुवर्ण मुहूर्त मानला जातो. हा संपूर्ण दिवसच शुभ असल्याने या दिवशी कोणत्याही शुभकार्यासाठी वेगळा मुहूर्त पाहिला जात नाही, परंतु यंदाच्या अक्षय्य तृतीयेला मात्र एकही शुभकार्य पार पडणार नाही, कारण या काळात गुरू आणि शुक्र ग्रह अस्त अवस्थेत आहेत. (सोनाली भाटी, प्रतिनिधी / जालौर)
1/5
नवग्रहांपैकी गुरू ग्रहाला देवांचा गुरू म्हणतात, तर शुक्र ग्रह हा राक्षसांचा गुरू मानला जातो. त्यामुळे शुभकार्यांवर या दोन्ही ग्रहांचा विशेष प्रभाव असतो. आता हे दोन्ही ग्रह अस्त अवस्थेत असल्याने सर्व शुभकार्यांना काहीकाळ पूर्णविराम बसेल. म्हणजेच या काळात कोणताही शुभ मुहूर्त मिळणार नाही.
नवग्रहांपैकी गुरू ग्रहाला देवांचा गुरू म्हणतात, तर शुक्र ग्रह हा राक्षसांचा गुरू मानला जातो. त्यामुळे शुभकार्यांवर या दोन्ही ग्रहांचा विशेष प्रभाव असतो. आता हे दोन्ही ग्रह अस्त अवस्थेत असल्याने सर्व शुभकार्यांना काहीकाळ पूर्णविराम बसेल. म्हणजेच या काळात कोणताही शुभ मुहूर्त मिळणार नाही.
advertisement
2/5
ज्योतिषी पंडित भानू प्रकाश दवे यांनी सांगितलं की, 28 एप्रिलला सकाळी 5 वाजून 17 मिनिटांनी शुक्र ग्रह मेष राशीत अस्त झाला होता. त्याचा आता 29 जून रोजी संध्याकाळी 7 वाजून 37 मिनिटांनी मिथुन राशीत उदय होईल. तर, 7 मे रोजी रात्री 10 वाजून 8 मिनिटांनी वृषभ राशीत गुरू ग्रहाचा अस्त झाला. आता येत्या 6 जूनला त्याचा उदय होईल. तोपर्यंत कोणतंही शुभकार्य पार पडणार नाही.
ज्योतिषी पंडित भानू प्रकाश दवे यांनी सांगितलं की, 28 एप्रिलला सकाळी 5 वाजून 17 मिनिटांनी शुक्र ग्रह मेष राशीत अस्त झाला होता. त्याचा आता 29 जून रोजी संध्याकाळी 7 वाजून 37 मिनिटांनी मिथुन राशीत उदय होईल. तर, 7 मे रोजी रात्री 10 वाजून 8 मिनिटांनी वृषभ राशीत गुरू ग्रहाचा अस्त झाला. आता येत्या 6 जूनला त्याचा उदय होईल. तोपर्यंत कोणतंही शुभकार्य पार पडणार नाही.
advertisement
3/5
ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा सूर्यापासून एका ठराविक अंतरावर एखादा ग्रह येतो तेव्हा त्या ग्रहाची शक्ती खूप कमी होते आणि तो अस्त अवस्थेत मानला जातो. त्यातच शुक्राला सुख, समृद्धी, धनसंपत्ती, वैवाहिक जीवन आणि ऐश्वर्याचं प्रतीक मानतात. तो अस्त असताना कोणतंही कार्य केल्यास त्यातून काहीच लाभ मिळत नाही.
ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा सूर्यापासून एका ठराविक अंतरावर एखादा ग्रह येतो तेव्हा त्या ग्रहाची शक्ती खूप कमी होते आणि तो अस्त अवस्थेत मानला जातो. त्यातच शुक्राला सुख, समृद्धी, धनसंपत्ती, वैवाहिक जीवन आणि ऐश्वर्याचं प्रतीक मानतात. तो अस्त असताना कोणतंही कार्य केल्यास त्यातून काहीच लाभ मिळत नाही.
advertisement
4/5
 सूर्यापासून 11 अंश अंतरावर गुरू ग्रह असेल तर त्याला अस्त मानतात आणि तेव्हा कोणतंही  पार पाडलं जात नाही. कारण गुरू ग्रह हा  आणि शुभकार्यांचा प्रतीक मानला जातो.
सूर्यापासून 11 अंश अंतरावर गुरू ग्रह असेल तर त्याला अस्त मानतात आणि तेव्हा कोणतंही शुभकार्य पार पाडलं जात नाही. कारण गुरू ग्रह हा धर्म आणि शुभकार्यांचा प्रतीक मानला जातो.
advertisement
5/5
 सूचना : येथे दिलेली माहिती  श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.
advertisement
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री, 'या' अभिनेत्यासाठी वेडी
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री असं का म्हणाली?
    View All
    advertisement