advertisement

Vastu Tips : देव्हाऱ्यात चुकूनही ठेवू नका 'या' 5 गोष्टी; अन्यथा होतं मोठं नुकसान अन् मानसिक त्रास

Last Updated:
घरातील देवघर ही केवळ पूजेसाठी नव्हे तर मानसिक व आध्यात्मिक बळ मिळवण्यासाठी महत्त्वाची जागा असते. मात्र अनावधानाने आपण अशा काही वस्तू देवघरात ठेवतो ज्या नकारात्मक ऊर्जा...
1/7
 प्रत्येक घरात एक अशी जागा नक्कीच असते जी सर्वात शांत, पवित्र आणि ऊर्जेने भरलेली असते आणि ती म्हणजे आपल्या घरचं देवघर. ही जागा फक्त पूजा करण्यासाठी नसते, तर ती आपल्या घरातील आध्यात्मिक ऊर्जा आणि श्रद्धेचं केंद्र असते. देवघरात बसून ध्यान करणं, देवाशी बोलणं आणि सकारात्मकता अनुभवणं, याने आपलं मानसिक आणि भावनिक आरोग्यही सुधारतं. पण अनेकवेळा कळत-नकळत आपण देवघरात काही अशा गोष्टी ठेवतो, ज्यामुळे तिथली पवित्रता कमी होते आणि पूजेचा प्रभावही कमी होतो.
प्रत्येक घरात एक अशी जागा नक्कीच असते जी सर्वात शांत, पवित्र आणि ऊर्जेने भरलेली असते आणि ती म्हणजे आपल्या घरचं देवघर. ही जागा फक्त पूजा करण्यासाठी नसते, तर ती आपल्या घरातील आध्यात्मिक ऊर्जा आणि श्रद्धेचं केंद्र असते. देवघरात बसून ध्यान करणं, देवाशी बोलणं आणि सकारात्मकता अनुभवणं, याने आपलं मानसिक आणि भावनिक आरोग्यही सुधारतं. पण अनेकवेळा कळत-नकळत आपण देवघरात काही अशा गोष्टी ठेवतो, ज्यामुळे तिथली पवित्रता कमी होते आणि पूजेचा प्रभावही कमी होतो.
advertisement
2/7
 वास्तुशास्त्रानुसार, काही गोष्टी देवघरात असणं शुभ मानलं जात नाही. या गोष्टी केवळ पूजेचा प्रभाव कमी करत नाहीत, तर घरात तणाव, अडचणी आणि आर्थिक नुकसान देखील करू शकतात. चला तर मग जाणून घेऊया अशा 5 गोष्टींविषयी ज्या देवघरात नसाव्यात. याबद्दल ज्योतिषी आणि वास्तुशास्त्र तज्ज्ञ अंशुळ त्रिपाठी माहिती देत आहेत.
वास्तुशास्त्रानुसार, काही गोष्टी देवघरात असणं शुभ मानलं जात नाही. या गोष्टी केवळ पूजेचा प्रभाव कमी करत नाहीत, तर घरात तणाव, अडचणी आणि आर्थिक नुकसान देखील करू शकतात. चला तर मग जाणून घेऊया अशा 5 गोष्टींविषयी ज्या देवघरात नसाव्यात. याबद्दल ज्योतिषी आणि वास्तुशास्त्र तज्ज्ञ अंशुळ त्रिपाठी माहिती देत आहेत.
advertisement
3/7
 धारदार वस्तू : चाकू, कात्री, पिन यांसारख्या कोणत्याही धारदार वस्तू देवघरात ठेवू नयेत. या वस्तू नकारात्मक ऊर्जा पसरवतात आणि पूजेच्या जागेची पवित्रता भंग करतात. यामुळे मनात अशांती निर्माण होते आणि घरातील वातावरणात तणाव येतो.
धारदार वस्तू : चाकू, कात्री, पिन यांसारख्या कोणत्याही धारदार वस्तू देवघरात ठेवू नयेत. या वस्तू नकारात्मक ऊर्जा पसरवतात आणि पूजेच्या जागेची पवित्रता भंग करतात. यामुळे मनात अशांती निर्माण होते आणि घरातील वातावरणात तणाव येतो.
advertisement
4/7
 एकापेक्षा जास्त शंख : शंख हे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि पूजेच्या वेळी तो फुंकल्याने सकारात्मक ऊर्जा येते. पण देवघरात एकापेक्षा जास्त शंख ठेवणं निषिद्ध मानलं जातं. यामुळे पैशाचं नुकसान होऊ शकतं आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यात अडथळा येऊ शकतो.
एकापेक्षा जास्त शंख : शंख हे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि पूजेच्या वेळी तो फुंकल्याने सकारात्मक ऊर्जा येते. पण देवघरात एकापेक्षा जास्त शंख ठेवणं निषिद्ध मानलं जातं. यामुळे पैशाचं नुकसान होऊ शकतं आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यात अडथळा येऊ शकतो.
advertisement
5/7
 फाटलेली किंवा जुनी धार्मिक पुस्तकं : रामायण, गीता, हनुमान चालिसा यांसारखी धार्मिक पुस्तकं देवघरात ठेवली जातात, पण ती स्वच्छ आणि पूर्ण असावी लागतात. फाटलेली किंवा तुटलेली पुस्तकं देवघरात ठेवल्याने तिथल्या ऊर्जेवर नकारात्मक परिणाम होतो. अशा स्थितीत देवी-देवतांचा आशीर्वाद मिळणं कठीण होतं.
फाटलेली किंवा जुनी धार्मिक पुस्तकं : रामायण, गीता, हनुमान चालिसा यांसारखी धार्मिक पुस्तकं देवघरात ठेवली जातात, पण ती स्वच्छ आणि पूर्ण असावी लागतात. फाटलेली किंवा तुटलेली पुस्तकं देवघरात ठेवल्याने तिथल्या ऊर्जेवर नकारात्मक परिणाम होतो. अशा स्थितीत देवी-देवतांचा आशीर्वाद मिळणं कठीण होतं.
advertisement
6/7
 अस्वच्छ किंवा जुने कपडे : देवघराची जागा अत्यंत स्वच्छ आणि पवित्र असावी लागते. घाणेरडे किंवा घामेजलेले कपडे तिथे कधीही ठेवू नयेत. अशा कपड्यांमुळे पूजेची पवित्रता भंग पावते आणि देवी-देवतांचा वास तिथे राहत नाही. पूजेच्या वेळी परिधान केलेले कपडे देखील खास आणि स्वच्छ असावेत.
अस्वच्छ किंवा जुने कपडे : देवघराची जागा अत्यंत स्वच्छ आणि पवित्र असावी लागते. घाणेरडे किंवा घामेजलेले कपडे तिथे कधीही ठेवू नयेत. अशा कपड्यांमुळे पूजेची पवित्रता भंग पावते आणि देवी-देवतांचा वास तिथे राहत नाही. पूजेच्या वेळी परिधान केलेले कपडे देखील खास आणि स्वच्छ असावेत.
advertisement
7/7
 चामड्याच्या वस्तू : चामडं हे मृत जनावरांपासून मिळवलं जातं, त्यामुळे ते अपवित्र मानलं जातं. बेल्ट, पाकीट, बूट किंवा चप्पल यांसारख्या चामड्याच्या कोणत्याही वस्तू देवघरात ठेवू नयेत. यामुळे पूजेची जागा दूषित होते आणि त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. तसेच, चांगले परिणाम मिळण्यातही अडथळा येतो.
चामड्याच्या वस्तू : चामडं हे मृत जनावरांपासून मिळवलं जातं, त्यामुळे ते अपवित्र मानलं जातं. बेल्ट, पाकीट, बूट किंवा चप्पल यांसारख्या चामड्याच्या कोणत्याही वस्तू देवघरात ठेवू नयेत. यामुळे पूजेची जागा दूषित होते आणि त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. तसेच, चांगले परिणाम मिळण्यातही अडथळा येतो.
advertisement
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement