देवाला नमस्कारापूर्वी घंटा वाजवायची का नंतर? घंटा वाजवण्याचेही असतात नियम, तुम्हाला ते माहितीय का?

Last Updated:
काही लोकांचं म्हणणं आहे की आपण आलोय हे सांगण्यासाठी देवळात घंटा वाजवावी. पण धार्मिक शास्त्रांनुसार, घंटा वाजवण्याचेही काही विशिष्ट नियम आहेत, जे फार थोड्यांना माहीत आहेत.
1/5
मंदिरात दर्शनाला गेल्यावर प्रत्येक भक्त एक गोष्ट नक्की करतो. देवाच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना किंवा बाहेर पडताना घंटा वाजवणे. अनेकांना वाटतं, देवाच्या नावाचा स्मरण करताना घंटा वाजवली की पुण्य लाभतं. तर काही लोकांचं म्हणणं आहे की आपण आलोय हे सांगण्यासाठी देवळात घंटा वाजवावी. पण धार्मिक शास्त्रांनुसार, घंटा वाजवण्याचेही काही विशिष्ट नियम आहेत, जे फार थोड्यांना माहीत आहेत.
मंदिरात दर्शनाला गेल्यावर प्रत्येक भक्त एक गोष्ट नक्की करतो. देवाच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना किंवा बाहेर पडताना घंटा वाजवणे. अनेकांना वाटतं, देवाच्या नावाचा स्मरण करताना घंटा वाजवली की पुण्य लाभतं. तर काही लोकांचं म्हणणं आहे की आपण आलोय हे सांगण्यासाठी देवळात घंटा वाजवावी. पण धार्मिक शास्त्रांनुसार, घंटा वाजवण्याचेही काही विशिष्ट नियम आहेत, जे फार थोड्यांना माहीत आहेत.
advertisement
2/5
हिंदू धर्मातील परंपरेनुसार, मंदिरात प्रवेश करताच घंटा वाजवणे अत्यंत शुभ मानले जाते. असं मानलं जातं की घंटेच्या नादामुळे मंदिरातील देव-देवतांचे चैतन्य जागृत होते आणि त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा (Positive Energy) निर्माण होते. घंटेचा आवाज वातावरणातील नकारात्मकता दूर करून मन एकाग्र करतो आणि आपल्या मनात भक्तीभाव जागवतो.
हिंदू धर्मातील परंपरेनुसार, मंदिरात प्रवेश करताच घंटा वाजवणे अत्यंत शुभ मानले जाते. असं मानलं जातं की घंटेच्या नादामुळे मंदिरातील देव-देवतांचे चैतन्य जागृत होते आणि त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा (Positive Energy) निर्माण होते. घंटेचा आवाज वातावरणातील नकारात्मकता दूर करून मन एकाग्र करतो आणि आपल्या मनात भक्तीभाव जागवतो.
advertisement
3/5
पण बहुतेकांना हे माहित नसतं की मंदिरातून बाहेर पडताना घंटा वाजवणे योग्य मानले जात नाही. कारण मंदिरात देवतेच्या सान्निध्यात असताना आपल्या आत जो सकारात्मक कंपनांचा साठा तयार होतो, ती ऊर्जा बाहेर पडताना पुन्हा घंटा वाजवल्यास विखुरली जाते, असं मानलं जातं. म्हणजेच, बाहेर पडताना घंटा वाजवल्यास आपल्या आत निर्माण झालेली भक्तीशक्ती आणि शांती कमी होते.
पण बहुतेकांना हे माहित नसतं की मंदिरातून बाहेर पडताना घंटा वाजवणे योग्य मानले जात नाही. कारण मंदिरात देवतेच्या सान्निध्यात असताना आपल्या आत जो सकारात्मक कंपनांचा साठा तयार होतो, ती ऊर्जा बाहेर पडताना पुन्हा घंटा वाजवल्यास विखुरली जाते, असं मानलं जातं. म्हणजेच, बाहेर पडताना घंटा वाजवल्यास आपल्या आत निर्माण झालेली भक्तीशक्ती आणि शांती कमी होते.
advertisement
4/5
याशिवाय धार्मिक दृष्टिकोनातून असंही सांगितलं जातं की देवदर्शनानंतर शांतपणे बाहेर पडावं. त्या क्षणी आपल्यातली श्रद्धा आणि ऊर्जा स्थिर ठेवणं अधिक महत्त्वाचं असतं, न की पुन्हा घंटेच्या नादाने ती बाहेर सोडणं.
याशिवाय धार्मिक दृष्टिकोनातून असंही सांगितलं जातं की देवदर्शनानंतर शांतपणे बाहेर पडावं. त्या क्षणी आपल्यातली श्रद्धा आणि ऊर्जा स्थिर ठेवणं अधिक महत्त्वाचं असतं, न की पुन्हा घंटेच्या नादाने ती बाहेर सोडणं.
advertisement
5/5
म्हणून पुढच्या वेळी मंदिरात जाता तेव्हा लक्षात ठेवा देवाला नमस्कार करण्यापूर्वी घंटा वाजवा, पण बाहेर पडताना नाही. ही छोटीशी गोष्ट फक्त परंपरा नाही, तर श्रद्धा टिकवण्याचं आणि मनशांती मिळवण्याचं एक सुंदर तत्त्व आहे.
म्हणून पुढच्या वेळी मंदिरात जाता तेव्हा लक्षात ठेवा देवाला नमस्कार करण्यापूर्वी घंटा वाजवा, पण बाहेर पडताना नाही. ही छोटीशी गोष्ट फक्त परंपरा नाही, तर श्रद्धा टिकवण्याचं आणि मनशांती मिळवण्याचं एक सुंदर तत्त्व आहे.
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement