Team India : 'नॉक आऊट'मध्ये भारताला फक्त एका टीमपासून धोका, कॅप्टन सूर्या कसं भेदणार चक्रव्यूह?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 स्टेजला शनिवारपासून सुरूवात होणार आहे. सुपर-8 मध्ये प्रवेश केलेल्या टीमना 4-4 च्या दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. सुपर-8 मध्ये टीम इंडिया त्यांच्या सर्व 3 मॅच कुणाविरुद्ध खेळणार हेदेखील निश्चित झालं आहे.
advertisement
advertisement
advertisement
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला सामना रविवार 22 फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये होणार आहे. याचवर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या टी-20 सीरिजमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 3-1 ने पराभव केला होता. मागच्या काही काळात भारताचं दक्षिण आफ्रिकेविरुद्धचं रेकॉर्डही चांगलं आहे, ज्याचा फायदा भारताला या सामन्यात होऊ शकतो.
advertisement
advertisement
advertisement
वेस्ट इंडिजकडे शेमरन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, शरफेन रदरफोर्ड, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर असे दिग्गज टी-20 खेळाडू, तसंच गुडाकेश मोती आणि रोस्टन चेस हे दोघं उत्कृष्ट स्पिनर आहेत. याशिवाय वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना भारतामध्ये आयपीएल खेळण्याचाही अनुभव आहे, त्यामुळे टीम इंडियाला वेस्ट इंडिजपासून सावध राहावं लागणार आहे.









