भारतातील रहस्यमयी मंदिर, जिथे घडतात अविश्वसनीय घटना
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
भारतात अशी अनेक मंदिरे आहेत जी रहस्यमयी आहेत. त्या ठिकाणी अनेक अविश्वसनीय गोष्टी घडतात. अशाच काही रहस्यमयी मंदिरांविषयी जाणून घेऊया.
advertisement
मां कामाख्या देवी मंदिर - आसाममधील राजधानी गुवाहाटीजवळ हे चमत्कारिक मंदिर आहे. आई भगवतीच्या 51 शक्तीपीठांमध्ये समाविष्ट आहे. पौराणिक कथेनुसार, जेव्हा भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने माता सतीचे शरीर कापले तेव्हा त्यांच्या शरीराचा एक भाग कामाख्यात पडला. माता सतीचे अवयव ज्या ठिकाणी पडले होते त्या जागेला शक्तीपीठ म्हणतात. येथे कोणतीही मूर्ती नाही, फक्त सती मातेच्या अंगाची पूजा केली जाते. इथे नेहमी दगडातून पाणी बाहेर पडतं. महिन्यातून एकदा या दगडातून रक्ताची धारा वाहत असल्याचे सांगितले जाते. हे का आणि कसे घडते? याविषयी शास्त्रज्ञही सत्य शोधू शकलेले नाहीत.
advertisement
advertisement
तिरुपती बालाजी मंदिर - हे मंदिर आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील तिरुमला पर्वतावर आहे आणि भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. तिरुपती बालाजीचे खरे नाव श्री व्यंकटेश्वर स्वामी आहे. श्रद्धेनुसार भाविक येथे येतात आणि तिरुपती मंदिरात केस दान करतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे येथे एका वर्षात सुमारे 75 टन केस उगवले जातात. हे केस विकून तिरुपती मंदिराला 6.5 दशलक्ष रुपयांहून अधिक कमाई होते.
advertisement
advertisement









