Sharad Pawar : पहिला सर्जिकल स्ट्राईक ते टिळकांचं योगदान; पवारांच्या भाषणातील पाच महत्त्वाचे मुद्दे

Last Updated:

आज पुण्यात पंतप्रधान मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला शरद पवार यांची देखील उपस्थिती होती.

News18
News18
पुणे, 1 ऑगस्ट : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील उपस्थिती होती. यावेळी बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. पुण्याचं एक वेगळं ऐतिहासिक महत्त्व असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले शरद पवार? 
मी पंतप्रधानांना सांगू इच्छितो की पुण्याचं एक वेगळं असं ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इथे झाला. त्यांचं बालपण देखील इथेच गेलं. आज ज्या सर्जिकल स्ट्राईकची चर्चा होती. तो सर्जिकल स्ट्राईक पहिल्यांदा महाराजांनी लाल महालामध्ये केला होता. इतर राज्य संस्थानं त्यांच्या नावानं ओळखली जातात. मात्र शिवाजी महाराजांनी जे राज्य उभं केलं ते हिंदवी स्वराज्य रयतेचं राज्य म्हणून ओळखलं जातं.
advertisement
याच पुण्यात टिळकांनी स्वराज्याची मशाल पेटवली, गुलामगिरीविरोधात लढा उभारला. पुण्यात दोन गट होते एक जहाल आणि मवाळ जहाल गटाचं नेतृत्व टिळकांनी केलं. स्वातंत्र्यात टिळकांचं मोठं योगदान आहे. टिळकांनी पत्रकारितेला आपलं शस्त्र बनवलं. पत्रकारितेवरचा दबाव त्यांनी झुगारून लावला. पत्रकारितेवर कोणाचा दबाव असता कामा नये या मताचे टिळक होते असं पवार यांनी म्हटलं आहे.
advertisement
ते पुढे बोलताना म्हणाले की, टिळक पुरस्काराला एक आगळं -वेगळं महत्त्व आहे. आतापर्यंत अनेक प्रसिद्ध व्यक्तींना हा पुरस्कार मिळाला आहे. आज पंतप्रधान मोदी यांना हा पुरस्कार मिळाला, याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.
मराठी बातम्या/पुणे/
Sharad Pawar : पहिला सर्जिकल स्ट्राईक ते टिळकांचं योगदान; पवारांच्या भाषणातील पाच महत्त्वाचे मुद्दे
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement