Mahabharat : वाईट होता दुर्योधन, तरी त्याच्या मृत्यूनंतर देवतांनी त्याच्यावर उधळली होती फुलं, पण का?

Last Updated:

Mahabharat Story : महाभारताच्या काही आवृत्त्यांमध्ये, विशेषतः लोकप्रिय कथा आणि बी.आर. चोप्रा यांच्या महाभारतसारख्या टीव्ही मालिकांमध्ये दुर्योधनाच्या मृत्युनंतर देवतांनी आकाशातून पुष्पवृष्टी केल्याचा उल्लेख आहे.

AI Generated Image
AI Generated Image
नवी दिल्ली : महाभारत युद्धाच्या 18 व्या दिवशी जेव्हा कौरव सैन्य जवळजवळ नष्ट झालं होतं, तेव्हा दुर्योधन एकटाच राहिला. तो सरोवरात लपला. पांडवांनी त्याला शोधून काढलं. भीमाने त्याला गदा लढाईसाठी आव्हान दिलं. भीमाने दुर्योधनाच्या मांड्यांवर हल्ला केला दुर्योधन जमिनीवर पडला, गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. यानंतर देवतांनी त्याच्यावर पुष्पवृष्टी केली असं सांगितलं जातं. पण आयुष्यभर अधर्म करणाऱ्या दुर्योधनावर देवतांनी पुष्पवर्षाव हा केला असा प्रश्न पडतोच.
महाभारताच्या काही आवृत्त्यांमध्ये, विशेषतः लोकप्रिय कथा आणि बी.आर. चोप्रा यांच्या महाभारतसारख्या टीव्ही मालिकांमध्ये दुर्योधनाच्या मृत्युनंतर देवतांनी आकाशातून पुष्पवृष्टी केल्याचा उल्लेख आहे.
दुर्योधन जलाशयाच्या काठावर मृतावस्थेत पडला होता. त्याचा मृत्यू झाला नव्हता. तो अजूनही शुद्धीवर होता. भीमाने युद्ध हरल्यानंतर सरोवरात लपून बसलेल्या दुर्योधनला गदा लढाईचं आव्हान दिलं, तेव्हा तो बाहेर आला.  भीमाने त्याच्याशी जोरदार लढाई केली. शेवटी श्रीकृष्णाच्या इशाऱ्यावर भीमाने दुर्योधनाच्या मांड्यांवर हल्ला केला, जो गदा लढाईच्या नियमांविरुद्ध होता. दुर्योधनाच्या दोन्ही मांड्या मोडल्या. तो जमिनीवर पडला, गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला.
advertisement
दुर्योधनाच्या मृत्यवेळी दुर्योधन आणि कृष्णामधील संवाद
मृत्यूवेळी कृष्ण त्याला म्हणाला, तो युद्ध हरला. त्याने त्याचे सर्व भाऊ आणि त्याचं राज्य गमावलं याचं कारण तोच आहे. त्याने केलेल्या चुकांमुळे आणि पापांमुळे. तो लोभी होता. त्याने दुष्कर्म केले होते आणि म्हणूनच तो त्याचे परिणाम भोगत आहे.
advertisement
AI Generated Image
AI Generated Image
मग दुर्योधन म्हणाला, मी दान देऊन पृथ्वीवर राज्य केलं. शत्रूंशी शौर्याने लढलो. देवांना योग्य असलेलं दुर्मिळ राज्य उपभोगलं. सर्व संपत्ती मिळवली. शेवटी, माझ्यासारखे कोण आहे? कृष्णा, हे ऐक की मी माझ्या सर्व नातेवाईकांना आणि भावांना स्वर्गात घेऊन जाईन. तुमचा संकल्प पूर्ण होऊ शकला नाही.
advertisement
...अन् दुर्योधनावर आकाशातून पुष्पवृष्टी
दुर्योधनाने हे बोलताच आकाशातून देवतांनी त्याच्यावर फुलांचा वर्षाव केला.  अप्सरा आणि गंधर्वांनी गाणी म्हणायला सुरुवात केली. सिद्धगणांनी त्याला साधू म्हटलं.
दुर्योधनाचा असा सन्मान होताना पाहून कृष्ण आणि पांडवही लाजले. मग कृष्णाला पांडवांना सांगावं लागलं की जर मी युद्धात अन्याय्य मार्गांचा वापर केला कारण तुम्ही लोक निष्पक्ष युद्धात जिंकू शकत नाही. तुमच्या फायद्यासाठी, जेव्हा शत्रू अधिक शक्तिशाली झाले, तेव्हा मी त्यांना अनेक युक्त्यांचा वापर करून मारलं.
advertisement
देवतांनी दुर्योधनावर पुष्पवर्षाव का केला?
ही घटना पहिल्या दृष्टीक्षेपात आश्चर्यकारक आणि विरोधाभासी वाटते, कारण दुर्योधनाला अन्याय आणि क्रूरतेचे प्रतीक मानलं जात असं. महाभारतात दुर्योधनाला एक महत्त्वाकांक्षी, अहंकारी आणि मत्सरी पात्र म्हणून चित्रित केलं आहे ज्याच्या पांडवांशी, विशेषतः भीम आणि द्रौपदी यांच्याशी असलेल्या शत्रुत्वामुळे कुरुक्षेत्राचे युद्ध झालं. पांडवांना फासाच्या खेळात फसवणं आणि द्रौपदीचा अपमान करणं यामुळे तो अधर्माचं प्रतीक बनला.
advertisement
AI Generated Image
AI Generated Image
तरीही दुर्योधनाच्या व्यक्तिरेखेत काही सकारात्मक गुण होते, जसं की त्याचं शौर्य, त्याचा मित्र कर्णाशी निष्ठा आणि गदा लढाईत अतुलनीय कौशल्य. दुर्योधनाने शेवटपर्यंत आपला क्षत्रिय धर्म पाळला. शेवटपर्यंत आपलं कर्तव्य निभावलं. एक शूर योद्धा म्हणून तो मरण पावला. हिंदू परंपरेत शूर योद्ध्याच्या मृत्युचा सन्मान केला जातो. देवतांनी पुष्पवृष्टी करणं हे दुर्योधनाच्या शौर्याला श्रद्धांजली म्हणून पाहिलं जाऊ शकतं. यानंतर दुर्योधनाला त्याच्या भावांसह स्वर्गात स्थान मिळालं, असं म्हटलं जातं.
advertisement
(सूचना : हा लेख सर्वसामान्य धार्मिक माहिती आणि कथांवर आधारित आहे. जो फक्त माहितीसाठी देण्यात आला आहे. न्यूज18मराठीने याची पुष्टी केलेली नाही. कुणाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश न्यूज18मराठीचा नाही.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Mahabharat : वाईट होता दुर्योधन, तरी त्याच्या मृत्यूनंतर देवतांनी त्याच्यावर उधळली होती फुलं, पण का?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement