Makar Sankranti 2026 : मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे का घालतात? हे आहे खरं कारण

Last Updated:

नव्या वर्षाची सुरुवात होताच साजरा केला जाणारा मकर संक्रांत हा पहिला महत्त्वाचा सण मानला जातो. देशभरात विविध नावांनी आणि विविध पद्धतीने हा सण साजरा होत असला, तरी त्यामागील मूळ भावार्थ एकच आहे. निसर्गाचे आभार मानणे आणि नव्या पर्वाची सुरुवात करणे.

+
मकर

मकर संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे घालणं शुभ का असते  

छत्रपती संभाजीनगर : भारतीय संस्कृतीत सण-उत्सव केवळ आनंदासाठी साजरे केले जात नाहीत, तर त्यामागे धार्मिक, सामाजिक, ऋतूमानाशी संबंधित तसेच वैज्ञानिक कारणेही दडलेली असतात. प्रत्येक सणाची स्वतःची अशी एक ओळख असते. ठरलेले धार्मिक विधी, विशिष्ट पोशाख, पारंपरिक पदार्थ आणि लोकपरंपरा. नव्या वर्षाची सुरुवात होताच साजरा केला जाणारा मकर संक्रांत हा पहिला महत्त्वाचा सण मानला जातो. देशभरात विविध नावांनी आणि विविध पद्धतीने हा सण साजरा होत असला, तरी त्यामागील मूळ भावार्थ एकच आहे. निसर्गाचे आभार मानणे आणि नव्या पर्वाची सुरुवात करणे.
‎या सणाशी जोडलेली एक वेगळी आणि कुतूहल निर्माण करणारी बाब म्हणजे काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याची प्रथा. सामान्यतः हिंदू धर्मात काळा रंग शुभ मानला जात नाही. विवाह, पूजाविधी किंवा इतर मंगलकार्यांमध्ये काळ्या रंगाचे वस्त्र टाळले जाते. तरीही मकर संक्रांतीच्या दिवशी, विशेषतः काही भागांत काळे कपडे घालण्याची परंपरा आढळते. यामागे नेमके कारण काय, हा प्रश्न अनेकांना पडतो.
advertisement
‎ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याच्या या राशीपरिवर्तनालाच संक्रांत म्हटले जाते. सौर दिनदर्शिकेनुसार हा काळ सोल्स्टिसशी संबंधित आहे. हिवाळ्यातील हा कालखंड दिवस लहान आणि रात्र मोठी असते. मकर संक्रांतीनंतर दिवस हळूहळू मोठे होऊ लागतात, म्हणूनच या दिवसाला उत्तरायणाची सुरुवात मानली जाते. धार्मिक दृष्टीने उत्तरायणाला अत्यंत शुभ काळ मानले जाते आणि या मुहूर्तावर अनेक शुभ कार्यांना प्रारंभ केला जातो.
advertisement
‎काळ्या रंगाच्या संदर्भात एक धार्मिक मान्यता अशी आहे की, हिवाळ्यातील दीर्घ रात्रीचा अंधार संपवून प्रकाशाकडे वाटचाल सुरू होते, याचे प्रतीक म्हणून काळ्या रंगाला निरोप दिला जातो. काही ठिकाणी असेही मानले जाते की काळा रंग नकारात्मक ऊर्जा स्वतःकडे आकर्षित करतो आणि त्यामुळे शरीरावर किंवा मनावर होणारा दुष्परिणाम कमी होतो.
‎यासोबतच या परंपरेमागे एक महत्त्वाचे वैज्ञानिक कारणही आहे. मकर संक्रांती हा हिवाळ्यातील अत्यंत थंड दिवसांच्या आसपासचा काळ असतो. काळा रंग इतर रंगांच्या तुलनेत अधिक उष्णता शोषून घेतो. त्यामुळे शरीर उबदार राहण्यास मदत होते. थंडीपासून संरक्षण मिळावे, आरोग्य टिकून राहावे, यासाठी काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याची ही प्रथा रूढ झाली असावी, असे तज्ज्ञांचे मत आहे.
advertisement
मकर संक्रांतीला खाण्यापिण्यालाही विशेष महत्त्व आहे. तीळ, गूळ, बाजरी, ज्वारी यांसारखे पदार्थ या काळात शरीराला उष्णता देतात. तीळ-गुळाचे लाडू, पोळ्या, खिचडी, पुरणपोळी अशा पदार्थांचा समावेश आहारात केला जातो. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला या म्हणीतून सामाजिक सलोखा आणि आपुलकी जपण्याचा संदेश दिला जातो.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Makar Sankranti 2026 : मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे का घालतात? हे आहे खरं कारण
Next Article
advertisement
Kolhapur:  मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्ब, महायुतीचा तो आमदार कोण?
मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्
  • महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कोल्हापूरचे राजकारण

  • खळबळजनक व्हिडिओ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी झाली असल्याची चर्चा

View All
advertisement