वृंदावनमध्ये प्रेमानंद महाराजांविरोधात स्थानिकांची नाराजी; त्रस्त नागरिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Last Updated:

Premanand Maharaj controversy: मथुरातील वृंदावनमध्ये प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराजांविरोधात स्थानिक नागरिक संतापले आहेत. रात्री उशिरा होणाऱ्या भजन-कीर्तन, मोठ्या आवाजातील संगीत आणि फटाके यामुळे रात्रीची झोप उडाल्याची तक्रार नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

News18
News18
मथुरा: वृंदावनमधील प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराजांना कोण ओळखत नाही? देश-विदेशातील लोक त्यांना भेटण्यासाठी येतात. प्रेमानंद महाराजांना ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील होत असते. मात्र आता मथुरेतील लोक त्यांच्यावर नाराज झाले आहेत. ही नाराजी इतकी वाढली की लोकांनी मदतीसाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.
प्रेमानंद महाराज हे रोज रात्री २ वाजता छतिकारा रोडवरील त्यांच्या निवासस्थानापासून परिक्रमा मार्गावरील राधा काली कुंज आश्रमाकडे चालत जातात. या वेळी त्यांचे अनुयायी रस्त्यावर फुले आणि रंगांनी रांगोळी काढतात. पदयात्रेच्या दरम्यान हा मार्ग बंद केला जातो. एवढेच नाही तर त्यांचे अनुयायी मोठ्या साउंड सिस्टमसह भजन आणि कीर्तन संगीत वाजवताना त्यांच्यासोबत पदयात्रेत सहभागी होतात. ज्यामुळे या परिसरात झोपलेल्या लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो.
advertisement
मोठ्या आवाजात साउंड सिस्टम लावल्याने आमची रात्रीची मोड होते, असे लोकांचे म्हणणे आहे. यावरूनच संत प्रेमानंद महाराजांच्या काही अनुयायी आणि लोकांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर हे प्रकरण हळूहळू मथुरेपासून संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनले.
प्रेमानंद महाराजांची प्रकृती पुन्हा बिघडली; आश्रमातून आली मोठी अपडेट
वृंदावन संत प्रेमानंद महाराजांच्या रात्री उशिरा भेटीदरम्यान मोठ्या आवाजातील संगीत आणि फटाक्यांमुळे स्थानिक लोक संतप्त झाले. या प्रकरणी सुनरख रोडवरील एनआरआय ग्रीन कॉलनीतील लोकांनी रात्री एक बैठक घेतली. ज्यामध्ये सर्वांनी गाणी वाजवण्यावर आणि फटाके फोडण्यावर बंदी घालण्याची मागणी केली. त्यानंतर अचानक संत प्रेमानंद महाराजांचे काही अनुयायी तिथे पोहोचले आणि त्यांनी निदर्शकांशी वाद घालण्यास सुरुवात केली.
advertisement
रात्री उशिरा लोक झोपलेले असताना अशा प्रकारचे आवाज करणे योग्य नाही. यामुळे आजारी आणि वृद्ध लोक तसेच सकाळी लवकर शाळेत जाणाऱ्या मुलांना खूप त्रास होतो. एवढेच नाही तर रस्ता अडवल्यामुळे अनेक वेळा आजारी लोकांना रुग्णालयात नेण्यातही गैरसोय होते. त्यामुळे संत प्रेमानंदांच्या अनुयायांकडून केली जाणारी ही कृती थांबवण्यात यावी अशी मागणी वसाहतीतील लोकांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. संत प्रेमानंद महाराजांचे अनुयायी आणि स्थानिक नागरिक यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
वृंदावनमध्ये प्रेमानंद महाराजांविरोधात स्थानिकांची नाराजी; त्रस्त नागरिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement