मुलगाच का देतो मुखाग्नी? मुलांकडूनच का केले जातात अंतिम संस्कार? त्यामागचं नेमकं कारण काय?

Last Updated:

हिंदू धर्मानुसार मरणोत्तर आत्म्याला शांती मिळण्यासाठी योग्य प्रकारे अंतिम संस्कार होणे आवश्यक मानले जाते. यामध्ये 'मुखाग्नि' देणे सर्वात महत्त्वाचे मानले जाते आणि ती जबाबदारी पारंपरिकतः...

son last rites
son last rites
भारतीय संस्कृतीत अनेक प्रथा शतकानुशतके चालत आलेल्या आहेत. याचपैकी एक परंपरा म्हणजे - व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे अंतिम संस्कार मुलाने करावे. विशेषतः हिंदू धर्मात अशी दृढ श्रद्धा आहे की, अंतिम संस्काराच्या प्रक्रियेत मुलाची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. पण असं का आहे? यामागे काही धार्मिक किंवा सामाजिक कारण आहे का? चला तर मग भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून सोप्या भाषेत हे समजून घेऊया...
अंतिम संस्कारात मुखाग्नीचं महत्त्व
असं मानलं जातं की, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा त्याचे अंतिम संस्कार योग्य पद्धतीने केल्यावरच त्याच्या आत्म्याला शांती मिळते. या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुखाग्नी, म्हणजेच मृतदेहाला अग्नी देणे. हे काम पारंपरिकरित्या मुलाच्या हस्ते केले जाते.
'पुत्र' शब्दाचा अर्थ आणि धार्मिक महत्त्व
धार्मिक मान्यतेनुसार, "पुत्र" म्हणजे - जो मृत्यूनंतरही आपल्या आई-वडिलांना मार्गदर्शन करतो. अशीही श्रद्धा आहे की 'पुत्र' हा दोन अक्षरांनी बनलेला आहे - 'पु' म्हणजे नरक आणि 'त्र' म्हणजे तारणारा. म्हणजेच, पुत्र तो असतो जो आपल्या आई-वडिलांना मृत्यूनंतरच्या प्रवासात येणाऱ्या अडचणींपासून वाचवतो. याच विचारानुसार ही जबाबदारी मुलाला देण्यात आली होती.
advertisement
पूर्वी मुलींना नव्हते अधिकार
प्राचीन काळात समाजाची रचना काहीशी वेगळी होती. त्या काळात मुलींना जास्त अधिकार नव्हते. त्यांना घराबाहेर पडण्याचं, निर्णय घेण्याचं किंवा सामाजिक कार्यात भाग घेण्याचं स्वातंत्र्य कमी होतं. त्यामुळे मुलींसाठी अंतिम संस्कारासारखी कामं करणं योग्य नाही, असंही मानलं गेलं. हा विचार हळूहळू एक परंपरा बनली.
मुलगा असतो घराचा वारसदार
आणखी एक गोष्ट अशी मानली जाते की, मुलगा हा घराचा वारसदार असतो, तोच घराण्याची परंपरा पुढे नेतो, त्यामुळे मृत्यूनंतरची जबाबदारीही त्याचीच असते. पण वेळेनुसार परिस्थितीत बदल झाला आहे. आता मुलीही पूर्ण जबाबदारीने आपल्या कुटुंबाला आधार देत आहेत. अनेकदा मुली आपल्या आई-वडिलांची काळजी घेतात आणि त्यांच्या मृत्यूनंतरचे अंतिम संस्कारही पूर्ण करतात.
advertisement
आता मुलीही करत आहेत अंतिम संस्कार
आजच्या काळात कायदा आणि समाज दोघांनीही हे मान्य केलं आहे की मुलीसुद्धा अंतिम संस्कार करू शकतात. अनेक शहरांमध्ये मुली आपल्या आई किंवा वडिलांच्या चितेला अग्नी देतात आणि समाजही आता याकडे आदराने पाहू लागला आहे. हळूहळू परंपरा बदलत आहेत आणि लोक भावनांना अधिक महत्त्व देत आहेत.
advertisement
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
मुलगाच का देतो मुखाग्नी? मुलांकडूनच का केले जातात अंतिम संस्कार? त्यामागचं नेमकं कारण काय?
Next Article
advertisement
ZP Election: आता शाई पुसून दाखवाच! जिल्हा परिषदसाठी निवडणूक आयोगाचा नवा प्लॅन तयार, घेतला मोठा निर्णय
आता शाई पुसून दाखवाच! जिल्हा परिषदसाठी निवडणूक आयोगाचा नवा प्लॅन तयार, घेतला मोठ
  • मतदारांच्या बोटावर लावलेली मार्करची शाई सहज पुसली जात असल्याचे आरोप

  • निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण देत मतदारांचा गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न केला

  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार

View All
advertisement