IND vs PAK सामन्यात चिटिंग, 12 खेळाडू घेऊन पाकिस्तान मैदानात, हरमनप्रीतसोबत टॉसवेळी फ्रॉड, Video

Last Updated:

IND vs PAK Women World Cup महिला वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मॅच रेफरीच्या चुकीमुळे भारतीय टीमला टॉस गमवावा लागला आहे.

IND vs PAK सामन्यात चिटिंग, 12 खेळाडू घेऊन पाकिस्तान मैदानात, हरमनप्रीतसोबत टॉसवेळी फ्रॉड, Video
IND vs PAK सामन्यात चिटिंग, 12 खेळाडू घेऊन पाकिस्तान मैदानात, हरमनप्रीतसोबत टॉसवेळी फ्रॉड, Video
कोलंबो : महिला वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मॅच रेफरीच्या चुकीमुळे भारतीय टीमला टॉस गमवावा लागला आहे. टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणं उडवलं, यानंतर पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाने टेल म्हणले, पण नाणं हेड म्हणून जमिनीवर पडले. यानंतर दक्षिण आफ्रिकेचे मॅच रेफरी शांद्रे फ्रिट्झ यांनी चुकून सना हेड म्हणाल्याचं समजून पाकिस्तानने टॉस जिंकल्याचं जाहीर केलं. यानंतर पाकिस्तानच्या कर्णधाराने पहिले बॉलिंग करणार असल्याचं जाहीर केलं. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हिने या निर्णयाला आक्षेप घेतला नाही.
वर्ल्ड कपचे अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सने टॉसचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
advertisement

हस्तांदोलन नाही

भारत-पाकिस्तानच्या कर्णधारांनी या सामन्यातही हस्तांदोलन केलं नाही. याआधी आशिया कपमध्येही टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी कर्णधार सलमान आघासोबत हस्तांदोलन केलं नव्हतं. तसंच भारतीय टीमने पीसीबी प्रमुख मोहसीन नक्वी याच्याकडून ट्रॉफी घ्यायला नकार दिला होता. आशिया कप जिंकूनही भारतीय टीम ट्रॉफीशिवाय परत आली.

2011 वर्ल्ड कपमध्ये दोनदा टॉस

advertisement
याआधी 2011 च्या पुरुष वर्ल्ड कप फायनलमध्ये दोनदा टॉस झाला होता. भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या फायनलमध्ये धोनीने नाणे फेकले, पण चाहत्यांचा आवाज इतका जास्त होता की कुमार संगकारा काय म्हणाला, हेच मॅच रेफरी जेफ क्रो यांना समजलं नाही, त्यामुळे दोन्ही कर्णधारांनी पुन्हा एकदा टॉसला सहमती दर्शवली आणि पुन्हा एकदा टॉस झाला. यानंतर संगकाराने टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताने ऐतिहासिक विजय मिळवून दुसऱ्यांदा वनडे वर्ल्ड कप जिंकला.
advertisement

पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव

महिला वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव केला. 30 सप्टेंबरला झालेल्या या सामन्यात श्रीलंकेचा 59 रननी पराभव करून भारताने वर्ल्ड कपची विजयी सुरूवात केली. गुवाहाटीतील बरसापारा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने दिलेल्या 271 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा 45.4 ओव्हरमध्ये 211 रनवर ऑलआऊट झाला. 53 रन केल्यानंतर 3 विकेट घेणारी दीप्ती शर्मा सामनावीर ठरली.
advertisement
दुसरीकडे पाकिस्तानला मात्र पहिल्याच सामन्यात बांगलादेशकडून पराभवाचा धक्का बसला. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पाकिस्तानच्या महिला टीमला फक्त 129 रन करता आल्या, त्यानंतर बांगलादेशने 31.1 ओव्हरमध्ये फक्त 3 विकेट गमावून हे आव्हान पार केलं.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK सामन्यात चिटिंग, 12 खेळाडू घेऊन पाकिस्तान मैदानात, हरमनप्रीतसोबत टॉसवेळी फ्रॉड, Video
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement