IND vs SA : गंभीरला सेफ केलं, पहिल्या टेस्टच्या पराभवाला जबाबदार कोण? बॅटींग कोचने सगळंच सांगितलं

Last Updated:

भारताचा बॅटींग कोच सितांशु कोटक गंभीरच्या बचावासाठी पुढे आला आहे. सितांशू कोटक यांनी गंभीरची बाजू घेतली आहे. यासोबत कोलकत्ता टेस्टमधील भारताच्या लाजिरवाण्या पराभवाला कोण जबाबदार होता? यावर देखील त्यांनी सगळंच सांगून टाकलं आहे.

ind vs sa 2nd test
ind vs sa 2nd test
India vs South Africa News : कोलकत्ताच्या ईडन गार्डनच्या मैदानावर साऊथ आफ्रिकेने टीम इंडियाचा अवघ्या 30 धावांनी लाजिरवाणा पराभव केला होता.या पराभवानंतर आता गौतम गंभीर आणि त्याच्या रणनितीवरून चौफेर टीका सूरू आहे. ही टीका सूरू असतानाच भारताचा बॅटींग कोच सितांशु कोटक गंभीरच्या बचावासाठी पुढे आला आहे. सितांशू कोटक यांनी गंभीरची बाजू घेतली आहे. यासोबत कोलकत्ता टेस्टमधील भारताच्या लाजिरवाण्या पराभवाला कोण जबाबदार होता? यावर देखील त्यांनी सगळंच सांगून टाकलं आहे.
गुवाहाटीत रंगणाऱ्या दुसर्‍या टेस्टआधी भारताचे बॅटींग कोच सितांशू कोटक यांची पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदेत सितांशु कोटक यांनी गंभीर होणाऱ्या टीकेनंतर त्यांचा बचाव केला आहे. "मला एक गोष्ट जाणवली आहे की लोक फक्त गौतम गंभीर, गौतम गंभीर, गौतम गंभीर म्हणत आहेत. कोणीही म्हणत नाही की या फलंदाजाने हे केले, या गोलंदाजाने ते केले, किंवा मी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काहीतरी वेगळे करू शकतो," असे कोटक यांनी सांगितले.
advertisement
''भारताने खेळलेल्या गेल्या 30-35 सामन्यांपैकी, आम्ही फक्त दोन सामने गमावले आहेत. आम्ही जिंकलेल्या सर्व सामन्यांचे श्रेय कोणीही देत ​​नाही. आम्ही गमावलेल्या दोन सामन्यांवरून, प्रत्येकजण 'गौतम गंभीर, गौतम गंभीर' असे म्हणत सितांशु कोटक यांनी टीकाकारांना सुनावलं आहे.
''मी हे म्हणत आहे कारण मी (कोचिंग स्टाफचा) सदस्य आहे आणि मला वाईट वाटते. ते तसे नाही (असायला हवे). कदाचित काही व्यक्तींचे काही अजेंडे असतील. त्यांना शुभेच्छा, पण ते खूप वाईट आहे,'' असे कोटक यांनी सांगितले.
advertisement
दरम्यान गौतम गंभीरने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते की भारताला खरोखरच तीच खेळपट्टी हवी होती आणि सामना पूर्णपणे त्याच्या संघाच्या अक्षमतेमुळे गमावला गेला.त्यामुळे गेल्या सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत गौतमने सर्व दोष स्वतःवर घेतला होता. त्याने असे केले कारण त्याला वाटले की दोष क्युरेटरवर येऊ नये''असे सितांशु कोटक यांनी सांगितले.
खेळपट्टीच्या वादावर कोटक काय बोलले?
सितांशु कोटक यांनी ईडन गार्डनच्या मैदानावर तीनच दिवसात सामना कसा संपला? यामागे देखील आपलं तर्क मांडलं आहे. ''आता, शेवटच्या सामन्यात पहिल्या दिवसानंतर जे घडले ते कोसळल्यासारखे वाटले. माती थोडीशी खाली येत होती. तुम्ही सर्वजण ते पाहू शकता. ते अपेक्षित नव्हते. जरी फिरकी अपेक्षित असली तरी, ती तीन दिवसांनंतर किंवा तिसऱ्या दिवसाच्या संध्याकाळी होती. क्युरेटरनाही ते नको होते. मी तुम्हाला खरं सांगतोय. असं असायला हवं होतं असं कुणालाही वाटत नव्हतं.
advertisement
''आता, दुसऱ्या दिवसापासूनच विकेट खूप कोरडी झाली किंवा विकेटचा वरचा थर, जे मी वाचलं होतं, ते खूप कोरडा झाला. आणि खालचा थर खूप कठीण होता कारण तिथे खूप रोलिंग होतं. कदाचित त्यामुळेच हे घडलं असावं, असं मला वाटतंय,'' असे कोटक यांनी सांगितले.
तसेच जेव्हा आपण परदेशात जातो, मग तो इंग्लंड असो किंवा ऑस्ट्रेलिया, कोणताही देश त्याच्या ताकदीनुसार खेळेल. भारतात, आपण फिरकीवर अवलंबून असतो. आपल्याला फक्त थोडी फिरकी हवी असते कारण फिरकी ही आपली ताकद असते.अन्यथा, खरंच, तुम्ही कोणत्याही क्युरेटरला विचारू शकता, आम्ही कधीही अशी खेळपट्टी मागितली नाही जिथे सामना दोन दिवसांत संपला किंवा चौरस टर्नर असेल, असे कोटक पुढे म्हणाले आहेत.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : गंभीरला सेफ केलं, पहिल्या टेस्टच्या पराभवाला जबाबदार कोण? बॅटींग कोचने सगळंच सांगितलं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement