छत्रपती संभाजीनगर : मासिक पाळी येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. महिन्यातून एक वेळा ही प्रत्येक महिलेला येत असते. मात्र, महिला या कोणत्याही कारणामुळे किंवा धार्मिक कामासाठी पाळी लांबविण्याच्या गोळ्या घेतात. मात्र, याचे अनेक वाईट परिणाम हे आपल्या शरीरावर होतात. त्यामुळे यामुळे शरीरावर नेमके काय दुष्परिणाम होतात, याबाबत स्त्रीरोग तज्ञ डॉ. रश्मी बोरीकर यांनी महत्त्वाची माहिती दिली.



