Marathi Superhit Song : 2 ऑक्टोबर 2015 मध्ये अभिनेता अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांचा 'दगडी चाळ' चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात 1996 च्या काळात गँगवॉरमध्ये अडकलेली मुंबई दाखवली आहे. या चित्रपटातील 'मन धागा धागा जोडते' हे गाणं खूपच लोकप्रिय झाले होते. हे गाणं हर्षवर्धन वावरे आणि आनंदी जोशी यांनी गायले होते. तर संगीत अमितराज यांचे होते. क्षितीज पटवर्धन यांच्या लेखणीतून हे गाणं उतरले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे चंद्रकांत कणसे यांचे होते. यातील प्रेमकथा चाहत्यांच्या खूपच पसंतीस पडली होती.
Last Updated: December 03, 2025, 12:31 IST