यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकरी त्यातून बाहेर निघत असताना आता रब्बीमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं.जिल्ह्यातील अवकाळी पावसाचा रब्बी हंगामातील गहू आणि ज्वारी पिकाला धोका निर्माण झाला आहे. फळ उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.खरीप गेला आता रब्बी पिकही मातीमोल झालं. शेतकऱ्यांवर पुन्हा अकदा आस्मानी संकट आले आहे.



