पुणे: दिवसभर उन्हातान्हात बसून दगडांना फोडून त्यापासून तयार करण्यात आलेल्या वस्तूंना बाजारात काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणत मागणी होती. पण अलीकडे त्या वस्तूंचा वापर खूप कमी झाला आहे. त्यामुळे या लोकांच्या रोजगारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. तरी देखील हे लोक या वस्तू रात्रं- दिवस मेहनत करून बनवत असतात. एक वस्तू तयार करण्यासाठी त्याचा अख्खा दिवस जातो. दगड गोळा करण्यापासून, त्याला हाताने कोरून आकार देण्यापर्यंत आणि तयार वस्तू बाजारात विकण्यापर्यंत. एवढी मेहनत करून सुद्धा त्यांना योग्य मोबदला मिळत नाही. याविषयी सरस्वती रोदरे यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
Last Updated: November 25, 2025, 14:03 IST