Bigg Boss 19 मध्ये हे चार सदस्य ठरलेत 'तिकिट-टू-फिनाले'चे दावेदार, कोण पोहोचणार थेट फायनलला?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bigg Boss 19 : 'बिग बॉस 19'मध्ये नुकताच 'तिकिट टू फिनाले' हा टास्क पार पडला आहे. या टास्कमध्ये चार सदस्यांनी बाजी मारली आहे.
advertisement
advertisement
advertisement
'बिग बॉस'ने गार्डन एरिया ‘फायर ओशन’ सेटअपमध्ये रूपांतरित केला आणि दोन लावा रेस ट्रॅक तयार केले. स्पर्धकांना आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा जलद धावून ट्रॅक पार करणे आवश्यक होते. ज्यामुळे ते 'टिकिट-टू-फिनाले'च्या रेसमध्ये टिकून राहतील. एका वेळी केवळ दोन स्पर्धक धावू शकत होते, तर उर्वरित दोन सदस्य या सदस्यांची मदत करू शकत होते. या टास्कमध्ये एकूण चार रेस झाल्या. त्यापैकी चार जण पुढे गेले आणि उर्वरित चार जण एलिमिनेट झाले.
advertisement
रेस-1 मध्ये घोड्याचा आवाज आला आणि सर्व घरातील मंडळींनी पोती गवताने भरायला सुरुवात केली. हे 10 मिनिटांत करायचे होते. पुढील आवाजावर थांबून पोती उचलणे आवश्यक होते. त्यानंतर दोन्ही पोत्यांचे वजन मोजले गेले. ज्या सदस्यांच्या पोत्यांचे वजन जास्त होते, त्यांना हेल्पर्स मिळाले. ‘फिल्म विंडो’नुसार, पहिल्या राउंडमध्ये अशनूर पहिली सदस्य ठरली. तिने 'तिकीट-टू-फिनाले'ची दावेदारी मिळवली. तान्या मित्तलसोबत तिचा मुकाबला होता. येथे गौरवने आपल्या मैत्रिणीला पाठिंबा दिला आणि तिचा हेल्पर झाला, तर तान्यासाठी प्रणित हेल्पर होता, ज्याने शेवटच्या क्षणी चीटिंग केली.
advertisement
दुसऱ्या राउंडमध्ये प्रणित मोरे आणि शहबाज यांच्यात टास्क झाला. प्रणितचा हेल्पर गौरव होता आणि शहबाजचा अशनूर. या राउंडमध्ये प्रणित कंटेंडर ठरला आणि शहबाज एलिमिनेट झाला. तिसऱ्या राउंडमध्ये गौरव खन्ना आणि मालती चाहर यांच्यात टास्क पार पडला. अशनूरने गौरवला मदत केली आणि शहबाजने मालतीला. तिसऱ्या राउंडमध्ये गौरवने मालतीला हरवत दावेदारी जिंकली. चौथ्या राउंडमध्ये फरहाना आणि अमाल मलिक यांच्यात टास्क झाला. अमालला शहबाजने, तर फरहानाला गौरवने मदत केली. या राउंडमध्ये फरहानाने दावेदारी मिळवली. तर अमाल, तान्या, मालती आणि शहबाज यांचे हात रिकामे राहिले.
advertisement
फरहाना आणि शहबाजमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या आठवड्यात घरात कोणताही कॅप्टन नाही. शहबाजचा कार्यकाळ संपला आहे. अशा स्थितीत फरहाना नेहमीप्रमाणे यावेळीही आपली ड्यूटी करत नव्हती. तेव्हा शहनाज गिलचा भाऊ शहबाज तिला म्हणाला,,"भांडी धुऊन टाक, नाहीतर तुझ्या बेडवर आणून ठेवेन". यावरून वाद वाढला आणि अभिनेत्रीचा पारा चढला. या दरम्यान तिने एक प्लेटही फोडली. त्या प्लेटचा एक तुकडा बाजूला उभी असलेल्या तान्याला लागला, ज्यामुळे ती घाबरली आणि रडू लागली.


