टी-२० विश्वचषकाचा थरार संपला, भारत विश्वविजेता झाला, पण या विजयाचा जल्लोष आता अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. "फायनल जिंकल्यानंतर हार्दिकने मैदानात नको त्या कृती केल्या," असा आरोप करत पुण्यातील वकील वाजिद खान यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हार्दिकने विश्वचषक विजयाच्या सेलिब्रेशनदरम्यान राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे, ज्यामुळे क्रिकेटविश्वात एकच खळबळ उडाली आहे.



