घराच्या 'या' दिशेला चुकूनही लावू नका तुळस, वाढतील आर्थिक अडचणी; 'ही' दिशा उघडेल कुबेराचे द्वार!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रामध्ये तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते. ज्या घरात तुळशीचे रोप असते, तिथे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि भगवान विष्णूंसह माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रामध्ये तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते. ज्या घरात तुळशीचे रोप असते, तिथे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि भगवान विष्णूंसह माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. मात्र, वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप लावताना त्याची 'दिशा' अत्यंत महत्त्वाची असते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अंधाऱ्या ठिकाणी लावू नये: तुळशीला सूर्यप्रकाशाची नितांत गरज असते. ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश पोहोचत नाही किंवा जिथे नेहमी अंधार असतो, तिथे तुळस लावू नका. सुकलेली किंवा कोमेजलेली तुळस घरामध्ये नकारात्मकता वाढवते. जर तुळस सुकली असेल, तर ती सन्मानाने वाहत्या पाण्यात विसर्जित करून तिथे नवीन रोप लावावे.
advertisement
advertisement
पाणी अर्पण करण्याचे नियम: तुळशीला दररोज जल अर्पण करणे शुभ असते, मात्र रविवार आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये आणि तिची पानेही तोडू नयेत. शास्त्रानुसार, या दिवशी तुळस माता भगवान विष्णूंसाठी निर्जला व्रत करते, असे मानले जाते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)









