भारतात इथे लग्नानंतर नवरदेवच यायचे सासरी नांदायला; या परंपरेवरुनच पडलं गावाचं अजब नाव

Last Updated:

आज आम्ही तुम्हाला एका अनोख्या गावाबद्दल सांगणार आहोत. जिथे नवरी नव्हे तर नवरदेवच सासरी यायचा

नवरदेव जायचा सासरी (प्रतिकात्मक फोटो)
नवरदेव जायचा सासरी (प्रतिकात्मक फोटो)
नवी दिल्ली : घरजावई हा शब्द आपण अनेकदा ऐकला असेल. मात्र, आज राहणीमान आणि विचार कितीही बदलले असले तरी पत्नीच्या माहेरी जाऊन राहणारे पुरुष फारच कमी पाहायला मिळतील. आजही संपूर्ण भारतात, लग्नानंतर नवरीच आपल्या नवऱ्याच्या घरी म्हणजेच आपल्या सासरी जाते. मात्र, आज आम्ही तुम्हाला एका अनोख्या गावाबद्दल सांगणार आहोत. जिथे नवरी नव्हे तर नवरदेवच सासरी यायचा
झारखंडच्या सरायकेला-खरसावा जिल्ह्यात एक जावयांचं गाव आहे. याच कारणामुळे या गावाचं नाव जमाईपाडा असं पडलं आहे. इथे जावयाला ज्वाईं म्हटलं जातं. मात्र, बोलण्यासाठी सोपं असल्याने याचं नाव जमाईपाडा असं झालं. नवरदेव सासरी येण्याच्या या परंपरेची सुरुवात 1982 मध्ये झाली. अमूल्यो प्रधान नावाच्या व्यक्तीचं आपल्या मुलीवर खूप प्रेम होतं.
advertisement
याच कारणामुळे त्यांनी जावयालाच आपल्या घरी आणलं. त्यांच्या संसारात काही अडचणी किंवा समस्या येऊ नये, म्हणून त्यांना वेगळी जमीन देऊन घर दिलं. हे पाहून गावातील इतर लोकांनीही जावयाला आपल्याच गावात बोलवून राहायला लावलं. पाहता पाहता अनेक जावई येऊन या गावात राहू लागले. जावयांचं घर वेगळ्याभागांमध्ये असल्यानं या गावाला जमाईपाडा असं नाव पडलं
advertisement
आता या गावात जवळपास 200 कुटुंब आहेत. इथे अनेक इतर लोकही जमीन खरेदी करून राहण्यासाठी आले आहेत. मात्र, आता सगळं बदललं आहे. आता गावकऱ्यांचं म्हणणं आहे, की आता इथे असं काहीही होत नाही. त्यामुळे आम्हाला गावाचं नाव बदलून लक्ष्मी नगर करायचं आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
भारतात इथे लग्नानंतर नवरदेवच यायचे सासरी नांदायला; या परंपरेवरुनच पडलं गावाचं अजब नाव
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement