5 प्रश्न विचारले, एकाचंही उत्तर आलं नाही, व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं, नेमकं प्रकरण काय?

Last Updated:

शाळा, कॉलेज किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात त्यांची उत्तरं आली नाहीत, तर मार्क्स मिळत नाहीत, फेल होतो. पण अशा प्रश्नांची उत्तरं आली नाही म्हणून कुणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं तुम्ही ऐकलं आहे का?

प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
नवी दिल्ली : आपण शाळेत जाऊ लागतो, तेव्हा सगळ्यात आधी आपल्याला आपलं नाव आणि नंतर पत्ता शिकवला जातो. त्यानंतर हळूहळू इतर गावं, शहरं, तालुके, जिल्हे, राज्य, देश आणि मग जगातील इतर देशांची माहिती दिली जाते. या सगळ्या गोष्टी जनरल नॉलेजमध्ये येतात. म्हणजे सर्वसामान्यपणे याबाबत आपल्याला असायलाच हवी. शाळा किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये याबाबत प्रश्नही विचारले जातात त्यांची उत्तरं आली नाहीत, तर मार्क्स मिळत नाहीत, फेल होतो. पण अशा प्रश्नांची उत्तरं आली नाही म्हणून कुणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं तुम्ही ऐकलं आहे का?
advertisement
दिल्लीत हा प्रकार घडला आहे. दिल्ली गेलेली एक व्यक्ती जिला महाराष्ट्राबाबत प्रश्न विचारण्यात आले. या व्यक्तीला दिल्ली महाराष्ट्राबाबत 5 प्रश्न विचारले गेले. एकाही प्रश्नाचं उत्तर या व्यक्तीला आलं नाही. त्यामुळे पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली आहे. आता तुम्ही म्हणाल हा नेमका गुन्हा काय आहे? तर ही घटना आहे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील.
advertisement
आंतरराष्ट्रीय विमानाने जाणाऱ्या एका प्रवाशाला दिल्लीच्या इंदिरा गांधी नॅशनल एअरपोर्टवर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राबाबत काही प्रश्न विचारले. कारण त्याच्या पासपोर्टवर महाराष्ट्राचं नाव लिहिलं होतं. हा प्रवासी काम एअरच्या विमान RQ-4402 ने काबूलला जायला निघाला होता. त्याचं सामान तपासल्यानंतर तो  कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी ब्युरो ऑफ इमिग्रेशन काउंटरवर गेला, जिथं त्याची परीक्षा सुरू झाली. 
advertisement
एका वरिष्ठ विमानतळ सुरक्षा अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पासपोर्टवरून प्रवाशाची ओळख मोहम्मद रसूल नजीब खान अशी झाली आहे, ज्यावर नवी मुंबई, महाराष्ट्र आणि मुंबई हे त्याचं जन्मस्थान असल्याचा पत्ता लिहिलेला आहे.
advertisement
माणूस बोलताच इमिग्रेशन अधिकाऱ्यांना संशय आला. त्याच्या बोलण्याच्या पद्धतीत मुंबईचा प्रभाव किंवा मराठीचा कोणताही लवलेश दिसत नव्हता. ज्यामुळे त्याच्या ओळखीबद्दल शंका निर्माण झाली. पडताळणी करण्यासाठी अधिकाऱ्याने त्याला महाराष्ट्राशी संबंधित अनेक प्रश्न विचारले, पण प्रवाशाला एकाचंही उत्तर देता आलं नाही. काहीतरी गडबड आहे याची खात्री पटल्याने इमिग्रेशन कर्मचाऱ्यांनी त्याला पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतलं.
advertisement
चौकशीदरम्यान तो माणूस महाराष्ट्राचा नसून अफगाणिस्तानचा असल्याचं उघड झालं. त्याने मुंबईच्या पत्त्याचा वापर करून बेकायदेशीरपणे भारतीय पासपोर्ट मिळवल्याचा आरोप आहे. या शोधानंतर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याला पुढील चौकशीसाठी आयजीआय विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिलं.
मराठी बातम्या/Viral/
5 प्रश्न विचारले, एकाचंही उत्तर आलं नाही, व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं, नेमकं प्रकरण काय?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement