advertisement

Mango Price : आंबा फक्त ग्राहकांसाठी गोड, शेतकऱ्यांसाठी मात्र कडूच, भाव मिळेनाच! Video

Last Updated:

सध्या आंब्याचा हंगाम जोरात सुरु असून बाजारपेठेत विविध प्रकारचे आंबे मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. मात्र यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

+
आंबा

आंबा विक्री करताना हा विचार नक्की करा

बीड : सध्या आंब्याचा हंगाम जोरात सुरू असून बाजारपेठेत विविध प्रकारचे आंबे मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. मात्र, यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेतकऱ्याकडून थेट विक्री केला जाणारा आंबा 80 ते 100 रुपये प्रति डझन दराने विकला जातो आहे तर व्यापाऱ्यांच्या माध्यमातून हा आंबा 160 ते 180 रुपये प्रति डझनपर्यंत विक्री होत आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या वाट्याला कमी नफा येत असल्याची खंत कृषी अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी आंब्याचे उत्पादन अधिक असून त्यातच बाजारपेठेतील मागणी तुलनेने कमी झाल्याने दरात घट झाली आहे. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकरी आंब्याची लागवड, त्याची निगा राखणे, तोडणी आणि साठवणूक हे सर्व कामे पार पाडून जेव्हा तो विक्रीसाठी पुढे जातो तेव्हा कृषी उत्पादन सेवा क्षेत्रात प्रवेश करते. मात्र त्याचा मुख्य लाभ व्यापाऱ्यांना जातो.
advertisement
या पार्श्वभूमीवर कृषी अभ्यासक महादेव बिक्कड म्हणाले की, शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने केवळ घाऊक विक्री करण्यावर भर न देता किरकोळ विक्रीचा मार्ग स्वीकारावा. शेतकऱ्यांनी आपल्या आंब्याची थेट बाजारपेठेत विक्री केल्यास त्यांना अधिक नफा मिळू शकतो. यासाठी स्थानिक बाजार, हाट, प्रदर्शन, ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स अशा माध्यमांचा वापर करणे गरजेचे आहे.
advertisement
फक्त आंब्याची विक्री न करता, त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगाकडे शेतकऱ्यांनी वळावे, असेही बिक्कड यांचे मत आहे. आंब्यापासून लोणचे, आमसूल, जॅम, ज्यूस, स्क्वॅश, सॉस इत्यादी उत्पादने बनवून त्याची विक्री केल्यास मूल्यवर्धन होऊन उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते. यामुळे फळांचे संपूर्णतः उपयोग करता येतो आणि वाया जाण्याची शक्यता देखील कमी होते.
advertisement
शेवटी शेतकऱ्यांनी आंबा विक्रीत आत्मनिर्भर व्हावे आणि प्रक्रिया उद्योगाशी स्वतःला जोडून अधिक कमाई करण्याचे मार्ग शोधावे. शासनानेदेखील या दृष्टीने प्रशिक्षण, अनुदान व विपणनाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावू शकेल. बाजारपेठेतील स्पर्धा वाढत असताना स्वतःचे ब्रँड निर्माण करणे हेही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Mango Price : आंबा फक्त ग्राहकांसाठी गोड, शेतकऱ्यांसाठी मात्र कडूच, भाव मिळेनाच! Video
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement