एकदम कमी खर्च, मार्केटमध्ये तूफान मागणी, हे ९ विदेशी पिके तुम्हाला करतील मालामाल!
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Union Budget 2026 : केंद्र सरकारने सादर केलेला यंदाचा अर्थसंकल्प शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी नवी दिशा देणारा ठरणार असल्याचे मत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले आहे.
मुंबई : परदेशी भाजीपाला म्हणजे नेमकं काय? हे अजूनही अनेक शेतकरी आणि ग्राहकांना स्पष्टपणे माहीत नाही. मूळतः भारताबाहेरील देशांतून आलेल्या आणि आधुनिक शेती पद्धतींमध्ये लागवड केल्या जाणाऱ्या भाजीपाला पिकांना परदेशी भाजीपाला असे म्हटले जाते. या पिकांचा उगम युरोप, अमेरिका, चीन, जपान यांसारख्या देशांमध्ये झाला असून, गेल्या काही वर्षांत भारतातही त्यांची मागणी झपाट्याने वाढताना दिसत आहे.
हॉटेल ते निर्यात बाजारात वाढती मागणी
सध्या हॉटेल, रेस्टॉरंट, सुपरमार्केट आणि निर्यात बाजारात परदेशी भाजीपाल्याला मोठी पसंती मिळत आहे. आकर्षक दिसणे, वेगळी चव आणि उच्च पोषणमूल्ये ही या भाज्यांची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे या पिकांना पारंपरिक भाज्यांच्या तुलनेत चांगला दर मिळत असून, बाजारभाव सातत्याने तेजीत राहतो. बदलत्या जीवनशैलीमुळे आणि हेल्दी आहाराकडे वाढलेल्या ओढीमुळे शहरांमध्ये या भाज्यांची मागणी अधिक वाढली आहे.
advertisement
नियंत्रित वातावरणातच जास्त उत्पादन
बहुतेक परदेशी भाजीपाल्याची लागवड पॉलीहाऊस, शेडनेट, नेटहाऊस किंवा इतर नियंत्रित वातावरणात केली जाते. तापमान, आर्द्रता, पाणी आणि खतांचे योग्य व्यवस्थापन केल्यास या पिकांतून दर्जेदार उत्पादन मिळते. पारंपरिक शेतीच्या तुलनेत संरक्षित शेतीमध्ये रोग-किडीचा प्रादुर्भाव कमी राहतो आणि उत्पादन सातत्यपूर्ण मिळते. योग्य नियोजन केल्यास शेतकऱ्यांना या शेतीतून लक्षणीय नफा मिळू शकतो.
advertisement
लोकप्रिय परदेशी भाजीपाल्याची नावे
भारतात सध्या खालील परदेशी भाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. ब्रोकली, लेट्यूस, झुकीनी, सेलेरी, पार्सले, चेरी टोमॅटो, रंगीत ढोबळी मिरची (बेल पेपर), बसेल्स स्प्राऊट, आइसबर्ग लेट्यूस आदी. या भाज्या प्रामुख्याने उच्चभ्रू बाजारपेठेत आणि निर्यातीसाठी वापरल्या जातात.
परदेशी भाजीपाला शेती का फायदेशीर?
परदेशी भाजीपाल्याची शेती अनेक कारणांमुळे फायदेशीर मानली जाते.
advertisement
पहिले कारण म्हणजे उच्च बाजारभाव आणि सातत्यपूर्ण मागणी. हॉटेल, मॉल आणि निर्यात बाजारात या भाज्यांना चांगला दर मिळतो.
दुसरे म्हणजे कमी क्षेत्रात जास्त उत्पादन. संरक्षित शेती आणि मातीविना शेती तंत्रज्ञानामुळे मर्यादित जागेत अधिक उत्पादन घेता येते.
तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे संपूर्ण वर्षभर उत्पादनाची संधी. पॉलीहाऊस किंवा नेटहाऊसमुळे हंगामाच्या मर्यादा दूर होतात.
advertisement
याशिवाय थेट विक्री आणि करार शेती केल्यास मध्यस्थांचा खर्च कमी होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते.
शेतीतून किती उत्पन्न मिळू शकते?
परदेशी भाजीपाल्याच्या शेतीतून मिळणारे उत्पन्न शेतीच्या प्रकारावर अवलंबून असते.
ओपन फिल्ड लागवड (१ एकर) : अंदाजे २ ते ३ लाख रुपये प्रति हंगाम.
नेटहाऊस/शेडनेट शेती (१ एकर) : नियंत्रित वातावरणामुळे ४ ते ५ लाख रुपये प्रति हंगाम उत्पन्नाची शक्यता.
advertisement
पॉलीहाऊस शेती (१ एकर) : वर्षभर उत्पादनामुळे ७ ते ८ लाख रुपये प्रति वर्ष उत्पन्न मिळू शकते.
हायड्रोपोनिक्स किंवा मातीविना शेती (१ एकर) : लेट्यूस, सेलेरी, मायक्रोग्रीन्ससाठी १० ते १२ लाख रुपये प्रति वर्ष उत्पन्न शक्य आहे.
थेट विक्री किंवा करार शेती केल्यास एकूण उत्पन्नात २० ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 02, 2026 9:29 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
एकदम कमी खर्च, मार्केटमध्ये तूफान मागणी, हे ९ विदेशी पिके तुम्हाला करतील मालामाल!










