भारताचा अमेरिकेला मास्टरस्ट्रोक! १ ऑक्टोबरपासून या ४ देशांशी भारत मुक्त व्यापार सुरू करणार, कृषी क्षेत्राला फायदा होणार का?

Last Updated:

Agriculture News : भारताच्या व्यापार क्षेत्रात ऐतिहासिक टप्पा गाठला गेला आहे. १ ऑक्टोबरपासून युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन (EFTA) मधील चार देशांशी आईसलंड, लिचेस्टाईन, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड मुक्त व्यापार करार (FTA) लागू होणार आहे.

Agriculture News
Agriculture News
नवी दिल्ली : भारताच्या व्यापार क्षेत्रात ऐतिहासिक टप्पा गाठला गेला आहे. १ ऑक्टोबरपासून युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन (EFTA) मधील चार देशांशी आईसलंड, लिचेस्टाईन, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड मुक्त व्यापार करार (FTA) लागू होणार आहे. युरोपातील कोणत्याही गटाशी भारताने असा करार प्रथमच केला आहे. या करारामुळे थेट १० लाख रोजगारांच्या संधी निर्माण होणार असून, गुंतवणुकीचे नवे दरवाजे भारतात उघडणार आहेत.
१० मार्च २०२४ रोजी झाला होता करार
भारत आणि या चार देशांमध्ये व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार १० मार्च २०२४ रोजी झाला होता. मात्र प्रत्येक देशाच्या संसदेची आणि मंत्रिमंडळाची मान्यता घेणे आवश्यक असल्याने कराराच्या अंमलबजावणीस उशीर झाला. अखेर सर्व देशांनी मान्यता दिल्यामुळे १ ऑक्टोबरपासून करार अंमलात येणार आहे.
करारातील प्रमुख मुद्दे काय?
या चार देशांतून येणाऱ्या ८०-८५% वस्तूंवर भारतात शून्य टक्के आयात शुल्क असेल. भारतातून या देशांमध्ये जाणाऱ्या ९९% वस्तूंवर शून्य शुल्क आकारले जाईल. पहिल्या १० वर्षांत ५० अब्ज डॉलर गुंतवणूक, त्यानंतरच्या पाच वर्षांत आणखी ५० अब्ज डॉलरची गुंतवणूक अपेक्षित आहे. यामुळे सुमारे १० लाख रोजगार थेट उपलब्ध होतील.
advertisement
कृषी क्षेत्राला फायदा होणार का?
स्थानिक शेतकरी व दुग्धव्यवसायिकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी भारताने कृषी आणि डेअरी उद्योगाला या करारातून वगळले आहे. यामुळे देशांतर्गत बाजारपेठेवर परिणाम होणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
चीनकडून भारताला औषध क्षेत्रात दिलासा
याच पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाची आर्थिक घडामोड घडली आहे. चीनने भारतातील औषध उत्पादनांवरील ३०% आयात शुल्क हटवून ते शून्य टक्क्यांवर आणले आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय औषधांवर १००% अतिरिक्त कर जाहीर केल्यानंतर चीनचे हे पाऊल भारतासाठी दिलासा देणारे ठरले आहे.
advertisement
व्यापाराचा सध्याचा आकडा
आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारताने या चार देशांना १.९७ अब्ज डॉलरची निर्यात केली. त्यापैकी ३३% निर्यात स्वित्झर्लंडला झाली. याउलट, या चारही देशांतून भारताने २२.४४ अब्ज डॉलरची आयात केली असून, त्यातील बहुतांश म्हणजे २१.८ अब्ज डॉलर स्वित्झर्लंडहून आली आहे.
भारतासाठी नवी संधी
या करारामुळे केवळ गुंतवणूक व रोजगारच वाढणार नाही, तर उद्योग, उत्पादनक्षमता आणि निर्यात क्षमताही उंचावेल, असा तज्ज्ञांचा विश्वास आहे. विशेषतः औद्योगिक, औषधनिर्मिती, तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात भारताला मोठा फायदा होणार आहे.
मराठी बातम्या/कृषी/
भारताचा अमेरिकेला मास्टरस्ट्रोक! १ ऑक्टोबरपासून या ४ देशांशी भारत मुक्त व्यापार सुरू करणार, कृषी क्षेत्राला फायदा होणार का?
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement