शेतकऱ्यांच्या कामाची बातमी! शेताला तार कुंपण करण्यासाठी सरकार देतंय पैसे, अर्ज कुठे कराल?

Last Updated:

Agriculture News :  शेतकऱ्यांच्या पिकांचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘तार कुंपण अनुदान योजना’ लागू केली आहे. शेतात वन्य प्राण्यांचा शिरकाव होऊन मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होते.

Tar Kumpan Yojana
Tar Kumpan Yojana
मुंबई : शेतकऱ्यांच्या पिकांचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘तार कुंपण अनुदान योजना’ लागू केली आहे. शेतात वन्य प्राण्यांचा शिरकाव होऊन मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होते. हत्ती, डुक्कर, नीलगाय, हरिण यांसारख्या प्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. याशिवाय अनियमित पाऊस, दुष्काळ, पाणीटंचाई यामुळे शेती आधीच संकटात असते. अशा वेळी पिकांचे संरक्षण करणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते.
advertisement
९० टक्के अनुदानावर कुंपण
या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ‘तार कुंपण अनुदान योजना’ सुरू केली आहे. योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सरकारकडून ९० टक्के अनुदान दिले जाते. उर्वरित १० टक्के खर्च शेतकऱ्यांना स्वतः करावा लागतो. योजनेनुसार २ क्विंटल काटेरी तार आणि ३० लोखंडी खांब बसवण्यासाठी आर्थिक मदत मिळते. हे कुंपण वन्य प्राण्यांना शेतात प्रवेश करण्यापासून अडवते आणि पिकांचे रक्षण करते.
advertisement
योजनेचे उद्दिष्ट
या योजनेमुळे शेतकऱ्यांना आपली शेती सुरक्षित ठेवता येईल. पिकांचे नुकसान कमी होऊन उत्पन्न वाढण्यास मदत होईल. यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि शेती व्यवसाय अधिक शाश्वत होईल.
अर्ज करण्याची प्रक्रिया
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या पंचायत समितीकडे अर्ज करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून संवर्ग विकास अधिकारी (पंचायत समिती) यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.
advertisement
आवश्यक कागदपत्रे
सातबारा उतारा व गाव नमुना ८
जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
आधार कार्ड
शेतीवर एकाहून अधिक मालक असल्यास संमती पत्र
ग्रामपंचायतीचा दाखला
वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
योजनेच्या अटी काय?
संबंधित जमिनीवर कोणतेही अतिक्रमण नसावे.
advertisement
वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक मार्गात येणाऱ्या जमिनींना लाभ मिळणार नाही.
ग्राम परिस्थिती विकास समिती किंवा संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडून संमती पत्र आवश्यक आहे. मंजूर शेतकऱ्यांनाक्विंटल काटेरी तार आणि ३० लोखंडी खांबांसाठी अनुदान दिले जाईल.
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर योजना
या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे योग्य रक्षण करता येईल. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील शेतकरी यामुळे दिलासा मिळवतील. शेतीतील उत्पादनात स्थैर्य येईल, तसेच पीक विमा आणि इतर सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सुरक्षिततेची हमी मिळेल.
advertisement
दरम्यान, महाराष्ट्र शासनाची ही योजना शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची ठरत आहे. कमी खर्चात प्रभावी उपाय म्हणून तार कुंपण पिकांचे संरक्षण करण्यात मदत करेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपली शेती सुरक्षित करावी, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्यांच्या कामाची बातमी! शेताला तार कुंपण करण्यासाठी सरकार देतंय पैसे, अर्ज कुठे कराल?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement