शिरोडी खुर्द येथे उद्धव घुमे आठ वर्षांपूर्वी पारंपरिक पद्धतीची शेती करत होते. मात्र या शेतीमध्ये आर्थिक बजेट कोलमडून जात असे, त्यामुळे वेगळं काहीतरी नवीन करायचं त्यांनी ठरवलं आणि फुलशेतीकडे वळाले. यापूर्वी फुलशेतीत चांगला नफा मिळाला, मात्र यंदा लागवड क्षेत्र जास्त झालं, त्याचा परिणाम फुलांच्या भावावर झाला आणि त्यामुळे उत्पन्न कमी मिळण्याची शक्यता वाढली. तसेच फुलांच्या व्यवसायामध्ये मुस्लिम समाज जास्त अग्रेसर आहे, मात्र सध्याचा महिना रमजान उपवासाचा असल्यामुळे बऱ्याच व्यापाऱ्यांनी कामाला सुट्टी दिली आहे. परिणामी बाजारामध्ये फुलांची आवक वाढत आहे.
advertisement
युद्धाचा मोठा फटका, ऐन हंगामात टरबूजाचे दर 22 वरून 8 वर, शेतकऱ्याचा खर्च निघणे अवघड
फुलांचे भाव मार्चमध्ये तरी दहा ते पंधरा रुपये किलोपर्यंत राहतील, मात्र पुढील एक दोन महिन्यांमध्ये फुलांच्या भावात वाढ होऊ शकते. भाववाढ झाल्यास यामधून समाधानकारक उत्पन्न देखील मिळू शकते, मात्र सध्याची स्थिती पाहता उत्पन्नासाठी धोकादायक आहे. या फुलशेतीसाठी विविध खत-औषधांचा वापर करण्यात आला, तसेच मल्चिंगही वापरली, त्यामुळे एकूण साडेतीन एकरसाठी साडेतीन लाख रुपये खर्च लागला आहे, असे देखील घुमे यांनी म्हटले आहे.
इतर शेतकऱ्यांनी फुलशेतीत यावे का?
फुलशेतीची सध्याची स्थिती पाहता इतर शेतकऱ्यांनी देखील सध्या तरी या शेतीत यायला नकोय, मात्र बाजारभाव स्थिर झाल्यानंतर काही काळ उलटून गेल्यानंतर या शेतीमध्ये येण्यास काही हरकत नाही. फुलशेती चांगली आहे, मात्र बाजारभाव देखील तेवढाच त्यासाठी गरजेचा आहे. भाव जर कमी असेल तर खर्च देखील निघणे अवघड आहे. त्यामुळे सध्या 30 ते 40 रुपये किलो दराने फुलांची विक्री झाली तर खर्च निघू शकतो.





